Wednesday, December 26, 2018

दोस्ती

बरेच दिवस झाले, त्याचं लक्ष दिसत नव्हतं कशात. माझ्यासाठी तसा तो नवाच पण तरी सुरुवातीला थोडी तयारी आणि हुशारी दाखवली होती त्याने. पण आता Constantly तो घसरत चाललाय हे काही न कळण्यासारखं नव्हतं शिवाय त्याच्यात काहीतरी करण्याची जिद्द होती हे ही नजरेतून लपत नव्हतं. पण मग फक्त दहाच कसे?
दहावीच वर्ष म्हणजे तस बघायचं झालं तर आयुष्यातली पहिली महत्वाची पायरी. किमान त्यावेळी तरी आमच्यासाठी असंच सांगितलं जायचं. आता कदाचित हे शब्द नि असल्या व्याख्या बदलायला हव्यात; कारण त्यावेळी मी विद्यार्थी होतो आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना हे पटेल, समजेल अशी आशा करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल.

(illustration by Sandesh Rasal)

दिवाळी दरम्यान शाळेची सहामाही परीक्षा झाली. तसे आजकालचे विद्यार्थी, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आजची पिढीच तशी जरा उर्मट आणि उद्धटचं. आणि अभ्यास सोडून सगळ्यांतच यांची हुशारी. सर्व करून अभ्यासात अग्रेसर असणारे देखील अनेक आहेत. आमच्या वाट्याला नेहमी गाळच लागला. शेवटी शिक्षक म्हणून तो साफ करण्याची आणि नवनिर्माणाची जबाबदारी माझीचं.
सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी तास भरला. नित्यनियमाने हजेरी वगैरेची औपचारिकता झाल्यानंतर सगळ्यांचे पेपर वाटून झाले. वर्गातून सगळी मुले-मुली बरे गुण मिळवून पास होती. माझ्या विषयातही चांगला निकाल होता. पण चार एक मुलं काठावर देखील पास नव्हती आणि त्यातलाच हा सलमान. वार्षिक परिक्षेच्या अनुषंगाने त्यांचा आताच कान पिळण गरजेचं होतं. एका कुणाला उद्देशून अपमानित करण्यापेक्षा (चूक दाखवणं हे आजकालच्या कारट्यांना अपमान वाटतो) मी सर्वांना उद्देशून काही मार्गदर्शन करू लागलो. त्या नापास विद्यार्थी आणि काही कमी गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांमुळे तस माझ्याही मनाला लागलं होतं. मी भाऊक पणे एखादा बाप मुलाला ओरडावा तस बोलत होतो अगदी हक्काने. मी बोलत होतो, "अरे जराही लाजा नाहीत तुमच्यात हे असे मार्क्स मिळवून पास होणार आहात का बोर्ड एक्साम. अवघे तीन महिने उरलेत आणि ही अवस्था तुमची. कसे पास होणार. उद्या निकाल लागल्यावर रस्त्यात जेव्हा तुम्ही भेटता आणि त्यावेळी जेव्हा आनंदाने सांगता सर, हमे फस्ट क्लास मिला! तेव्हा आमची मान उंचावते पण तेच जर नापास झालात आणि तुमची नजर चोरटी झाली मान झुकली तर तिथे आमची मान शर्मेंन झुकते. तुम्हाला शिकायच नसेल तर कशाला इथं येऊन बसता. उद्या भीक मागायची वेळ येईल. तेव्हा आठवेल शिक्षणाच महत्व काय ते".
मी बरंच बोललो रागाने. त्यानंतर त्यांना पेपर कसा लिहावा यावर प्रकाश टाकला. मी थोडा तावातावातच होतो. माझं बोलून झालं, थोडं डोकं शांत ठेऊन सगळ्यांना शिक्षा म्हणून पेपर दोनदा लिहून आणायला सांगितला आणि माझा तास दोन कविता शिकवून पूर्ण केला.
सगळे विद्यार्थी निघू लागले. काही येऊन पुढल्या परीक्षेत जास्त गुण मिळवू अस आश्वासन तर काही कमी गुण मिळाल्याची कारणे देत होते. सगळे निघाले; तो शेवटच्या बाकावर तसाच बसून होता.
मी निघत असताना त्याने रस्ता अडवला आणि उद्गारला.
"सर दिल को लगी आपकी बात, आपने जो सर झुकाने और भीक वगैरा बोला, हमारी वजेसे..." सलमान.
"मग काय आरती करू का तुमची शंभरात वीस आणि पंचवीस गुण मिळवलेत म्हणून. ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी म्हणून बाहेर पडता ना त्यावेळी तुमची ओळख अमूक शिक्षकाचा विद्यार्थी म्हणून होते. तुम्ही चुकलात बरोबर असलात तरी शिकवण आमचीच आहे हेच समजतात लोक. मग तुमच्या ह्या हलगर्जीपणाने तुमचं तर वर्ष आयुष्य फुकट घालवता सोबत आमचं मान-प्रतिष्ठा ही धुळीला मिळवता." मी जरा रागातच बोलत होतो.
त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो बाकावर बसला. म्हणाला, "सर, मे दिन भर बाईक पर घुमता रेहता हू. स्कुल भी कभी बंक करता हू. दोस्त है के छोड ते ही नहीं. पेहले होम वर्क करता था, थोडा बहोत घरपे पढता था, पर अब दिनभर उन दोस्तो के साथ घुमता रेहता हू.
माझी पावलं दारातून मागे फिरली. विषय गंभीर वाटत होता. मी त्यांच्या समोर बसलो. म्हटलं, "का? त्यांना नको म्हणता येत नाही. हाताला पकडून तुला फिरवतात का. लहान आहेस का आता."
"करता हू मना सर. कई बार किया मना तो फिर दोस्ती का वास्ता देते है, बस क्या यही दोस्ती? दोस्त के लिये ये नहीं कर सकता वो नहीं कर सकता. मतलब के मजबूर कर देते है के मै पुरा दिन उनके साथ रहू. फिर मुझे मना भी नहीं करने होता, उनको बरा लगेगा सोच के उनके साथ ही घुमता रेहता हू. और सच बोलू तो पिछले दो महिने से मैने एक दिन भी घर पे पढाई नहीं किई.", सलमान म्हणाला.
हे ऐकून पहिलं तर त्याचेच कान फोडावे वाटलं पण खरं बोलतोय आणि त्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी त्याला आताच योग्य मार्ग दाखवणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम काय ते एव्हाना कळलं होतं. आता सोल्युशन द्यायला मला जमतंय की नाही ती माझी परीक्षा होती. मी सुरवात केली, "ते तुझे मित्र नाहीत".
"नहीं सर दोस्त ही है, मेरे साथ ही रेहते है", सलमान.
"मी बोलताना आता ऐकायचं फक्त, मला समजलं तुझं काय ते. आता माझं ऎक आणि नीट डोक्यात साठव."
"ठीक है, सर"

(illustration by Sandesh Rasal)

"वो तेरे दोस्त नहीं है, दोस्ती के बुरखे मे तेरे दुष्मन तेरे साथ है". तू ओळखायला चुकलायस. तुझ्या वयाला इतकी समज ही नाही म्हणा की काय योग्य-अयोग्य समजू शकेल."
"मित्र तो नसतो जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. मित्र तो नसतो जो संकटात टाकतो, मित्र कधीच आपल्याला चुकीचा सल्ला देत नाहीत, किंवा आपलं नुकसान होईल असं ही वागत नाहीत." तो आता कान टोचून ऐकत होता.
खरा मित्र आणि मैत्री मिळायला नशीब लागत. एकत्र राहील, एकत्र फिरलं नाहीतर एका वर्गात शिकलं म्हणजे तो मित्र झाला अस होत नाही. ती फक्त वाईट संगत आणि सोबत असते. जी काही काळासाठी असते. ती कितपत करावी ते ज्याचं त्याने ठरवावं." कदाचित सगळं त्याच्या डोक्यावरून जात होतं. तो नुसती ऐकण्याची भूमिका आता करत होता.
"तुझ्यासारखा मी पण एका बीएमसी शाळेत शिकलोय. चांगले वाईट..."
"क्या? सर आप बीएमसी?". तो.
"हा, तो इसमे क्या हुवा. वो स्कुल स्कुल नहीं होते. वहा पढाई नहीं होती. मी ही तुझ्यासारखा तसाच विद्यार्थी. आणि चांगले वाईट असे सगळे मित्र भेटले तिथेही आणि तिथून बाहेर पडल्यावर आजही. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर एक एक वाट्याडा भेटत गेला. ज्याने नातं जपलं, मन जोडलं तो मनात मित्र बनून राहिला. ज्याचा प्रवास संपला तो भूतकाळ बनून मागे सरला. प्रत्येक वाट्याडा वेगळा होता आणि तो माणूस वाईट नसतो रे त्याच्या सवयी चांगल्या वाईट असतात. त्यातल्या कुठल्या आपल्याला लावायच्या ते आपण ठरवायचं. दम मारायला चल, अड्ड्यावर चल, बसायला चल, असे सगळे अतरंगी मित्र माझेही आहेत. पण त्यातली ती वाईट सवयी सोडली तर त्यांच्यात चांगले ही गुण आहेत, काही कला आहेत खेळात हुशार आहेत. मी त्यांच्या बरोबर बसलो नसेन तरी खेळलो आहे. त्यांच्या सोबत पोरींची छेड काढली नसली तरी मुलींशी मैत्री केली आहे. शाळेत असताना शेवटची चार वर्षे तर शेवटच्या बाकावर बसून काढलीत पण आजही शाळेतला शिक्षक हुशार नाही पण चांगला विद्यार्थी म्हणून तरी ओळखतात."
"सर आप भी... फिर भी टीचर... मेरे भी दोस्त घुमाते है, कभी कोई मैदान, फिर वो दारू अड्डा, नाके पे, चाय की टपरी पे, उनके साथ उनकी बात नहीं मानी तो नाराज होते है और दोस्ती तोड रहा है बोलके करवा लेते है सब." सलमान म्हणाला.
"का विरोध करता येत नाही. तुझ्या या अभ्यासावर आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होतोय हे समजतंय ना. जिथे योग्य तिथे वेळ दे, जिथे चुकीच किंवा पटत नाही तिथे सरळ विरोध कर मग अशी मैत्री तुटली तरी चालेल. सोबत राहून पाठीत वार करणारे शंभर मित्र जोडू नकोस. पर तेरे सुख दुःख मे हमेशा तेरा साथ दे, तुझे सही राह दिखाये और तेरे नुकसान के बजाये अपने साथ आगे बढणे का हौसला दे ऎसे चार दोस्त जरूर बनाना."
त्याला समजलं असावं असं चेहऱ्यावर दिसत होतं पण शब्दात काही उतरत नव्हतं.
"सर अच्छा हुवा आज आपसे बात करके दोस्ती का मतलब तो समझ सका", कोशीश करुंगा सर अब सही गलत समझने की, दोस्ती सबसे मगर रिश्ता कुछ अपनो से जोडने की और साथ मे अच्छी पढाई करने की", सलमान.
चला अर्धा तास रामायण वाचल्याचं समाधान मिळालं. मी हसलो आणि म्हणालो, "जा आता आणि परत असा मित्र भेटला की मला भेटायला आण, त्याला म्हणावं त्याच्या पेक्षा टपोरी फंटर है इधर".
तो हसत आणि विचार करत जड डोक्याने निघून गेला.
मागो माग मीही निघालो, तो नाक्यावर दिसला. लिफ्ट मागत होतो. मी जाऊन गाडी बाजूला थांबवल्यावर बसला आणि स्टेशन को छोडो भाईसाब म्हटला. मी काही न बोलता सोडलं. गाडीवरून उतरून तो थँक्स बोलून निघत होता. हेल्मेट काढल्यावर थांबला. "सर आप, सॉरी सर देखा नहीं मैने, वो सोच मे था तो बस बैठ गया... पर आप तो उस साईड जाते है फिर यहा... मी हेल्मेट घालत म्हटलं, "दोस्त वो नहीं होता जो तुम्हारा रास्ता बदले, बल्कि वो होता है जो तुम्हारे लिये अपना रास्ता बदले" आणि निघालो.
तो तिथेच उभा एकटक पाठमोऱ्या धावणाऱ्या गाडीकडे बघत पुटपुटला. एक सच्चा दोस्त मिल गया...

- रोh@nj



Monday, November 26, 2018

घटस्फोट...(शेवटचा अर्धा तास)

आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...


"तू नेहमीच अस करतोयस. तुझा प्रॉब्लेम काय नेमका कळत नाहीय मला. लग्न झाल्यापासून मला विकत घेतल्यासारखा मालकी हक्क दाखवतोयस. माझं स्वातंत्र्य, माझं फ्रीडम, माझी लाईफ स्टाईल सगळं हिरावून घेतलयस तू. बांधून ठेवलायस मला. बस आता. मला माझं स्वातंत्र्य परत हवंय. I want Divorce."
त्याची पटकन मान माझ्याकडे फिरली. होकारार्थी मान हलवून तो घराबाहेर निघून गेला. मी बोलताना कसलाही विचार केला नाही. बस माझ्या डोक्यात संताप होता. मनात राग होता. जिभेवर ताबा नव्हता. शब्द फेकत होती मी फक्त त्याच्या दिशेने. मी दारूच्या नशेत होते. पण तो काहीच का नाही बोलला. आज त्याने ना वाद घातला ना आपली बाजू मांडली. माझ्या निर्णयावर फक्त शिक्कामोर्तब करून निघून गेला.

श्री च्या बड्डे दिवशीचा वाद आणि आमचं बोलणं कदाचीत शेवटचं. आम्ही पार्टीहून आलो आणि त्याने घरात तमाशा केला.
"तुला कितीवेळा सांगितलं हे असले कपडे घालू नको, तुला सांगितलेल कळत नाही".
"का काय वाईट आहे या कपड्यात, कोणी घालत नाहीत का वन पीस किंवा वेस्टर्न ड्रेसेस. मी घातला तर काय बिघडलं आणि यापूर्वी कधी घातला नव्हता का? लग्नाआधी घातला नव्हता का?
"कपडे घालण्याचा किंवा तुझ्या आवडीनिवडीचा मला काही प्रॉब्लेम नाहीय. पण कुठे कस राहावं याचं भान विसरलीयस तू. तुझी आवड निवड आहे; मान्य य ना मला आणि ती जप तू, पण ते माझ्याजवळ किंवा जिथे आपली माणस असतील तिथे. चार चौघात आवड निवड नाही संस्कार आणि चारित्र्याच्या दृष्टीने पाहिलं जातं."
"वाह... लोकांची ही भीती तुला कधीपासून वाटू लागली रे. बोलणारे बोलणारच पण तुही त्यांच्यासारखा वागशील का? लग्नाआधी तरी तुला या गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. एका मंगळसूत्राने इतका काय फरक पडला."


"खूप फरक पडतो मेघना! खूप फरक पडतो. हा फरकच तुला समजत नाहीय, म्हणून आज ही वेळ आलीय.
चार चौघात जिथे वेगवेगळी नाती माणसं एकत्र येतात तिथे तुझ्या फ्रँकली बोलण्याला तुझा उद्धटपणा समजला जातो. मॉडर्न कल्चर नुसार वागण्याला चारित्र्यावर प्रश्न केला जातो.
बोलणारे बोलतील... तुझं खाणं... पिनं... बोलणं... त्यांच्यापुढ्यात राहणं या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीक लक्ष असत... पण तुला काहीच फरक पडत नाही. पण मला पडतो;
कारण तुझ्या फ्रँकली वागण्याला आणि चांगुलपणाला समोर वाह वाह करणारे तुझ्या मागे जेव्हा तुझी निंदा करतात.. तुला उद्धट म्हणून हिनवतात... त्याचा या कडू शब्दांचा मला फरक पडतो...

जेव्हा तू मॉडर्न विचारांनी त्यांना समोर जातेस आणि लोक पुढ्यात कौतुक करून मागे तेच लोक तुझ्या पाठीवर तुझ्या आईवडिलांचे संस्कार काढतात... त्याचा मला फरक पडतो...

जेव्हा तुला मॉडर्न लूक मध्ये बघून ब्युटीफुल, सुंदर म्हणणारे तुझ्या अर्धनग्न छाताडावर वाकडी नजर फिरवतात...
तू पाठ फिरवल्यावर त्याच तुझ्या अंगावरच्या तिळाबद्दल गॉसिप करतात...
त्यांच्या या वाकड्या नजरेचा मला मला फरक पडतो...
फरक पडतो मला...
तुम्हा बायकांना रूपाबद्दल, सुंदरतेबद्दल कौतुक ऐकायला आवडत म्हणून हा नटा पटा ना... मग आपल्या दोन चार माणसापर्यंत हरकत नाही... पण जगासमोर का? त्यांच्या कौतुकाची भूक का?
या सगळ्याचा तुला नाही ग पण मला त्रास होतो, मला फरक पडतो. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याबद्दल एकजरी चुकीची गोष्ट कानावर पडली.. तरी मला त्रास होतो... मला फरक पडतो कारण तू माझी आहेस आणि तुझ्याबद्दल अस ऐकणं काळजाला भोकं पाडून जात. तुझ्याबद्दल लोकांच्या तोंडून वाईट नाही ऐकू शकत मी. तुझी निंदा नालस्ती नाही सहन होत. तुला कोणी वाईट समजावं अस नाही वाटत मला. म्हणून फरक पडतो मला...
पण तुला काहीच फरक पडत नाही याचा, कळलं मला...
आणि हो मी आजही तोच आहे जसा होतो तसा तुझाच. लग्नाआधीही आणि नंतरही. थोडी मागे जाऊन आपलं नातं पाहिलस तर उत्तरं तुलाच भेटतील..."
"तुला त्रास होतो, तुला फरक पडतो मग सोडून का देत नाहीस मला. माझा लाईफची वाट लावलीयस तू. बदलला नाही म्हणतोस बघ हा तुझ्यातला बदल. तू असा नव्हतास रोशन. कोणत्या काळात जगतोयस, विचार बदल तुझे, मूर्खाचा बाजार लावलाय सगळा"
माझी चिडचिड आणि संतापलेली मी माझा माझ्यावरच ताबा नव्हता. विस्तवावर पाय ठेऊन आतल्या आत जळावं तस मी नशेत जळून निघाले होते. त्याने सांगितलेल्या चांगल्या गोष्टीही मला शिव्या वाटत होत्या. त्याचं माझ्यावरचं प्रेम आजही तितकंच आहे आणि त्याच प्रेमापोटी आणि काळजी पोटी तो नेहमी मला सांभाळून घेतो. मी अशी वेडी वाकडी असताना माझी प्रत्येक बाजू सावरतो. समजून घेतो. समजून सांगतो पण मी आजही तशीच पहिल्यासारखी बिनधास्त बेफिकीर. आणि त्याने खरं तर मला कधी अडवलं ही नाही. पण मागच्या महिन्यात श्रीच्या बड्डे दिवशी रात्रभर झालेला हा वाद आमच्यातला शेवटचा. आणि कदाचित तो संवाद ही शेवटचाच!

मात्र आठवड्याभरापूर्वी झालेल्या एकमुखी वादात त्याने हार मानली. त्याची काळजी आणि प्रेम कदाचित दिसून ही समजत नव्हतं. आणि तो निःशब्द झाला. मी दारूच्या नशेत होते. मला भान नव्हतं. त्याला घालून पाडून बोलले आणि त्याच्यावरच आरोप केला; माझं स्वातंत्र्य हिरावण्याचा. त्याने फक्त त्यावर होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला तुला सोड हवी ना.
ठिकय, उद्या साइन केलेले डिओस पेपर पोहचतील तुझ्याजवळ.
आणि निघून गेला. सकाळी पेपर माझ्याकडे होते.

आज आठवडा झाला या गोष्टीला. मला खरंच समजत नाहीय मी काय केलं कस वागले. आज माझा संसार मोडकळीस आलाय. त्याच्याशिवाय हा आठवडाच मला जगणं कठीण झालं होतं. मी पुढे कशी जगू त्याच्याशिवाय. मला गरज होती त्या ठिकाणी माझं अस कुणीच नसताना प्रत्येक गोष्टीत तो होता माझ्यासोबत. त्याची हीच काळजी, हेच प्रेम, समजूतदारपणा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याच प्रेमाला मी बंधन समजून, ओव्हर पझेसिव्ह समजून त्याला दुखावलं. त्याने मला खरंच बंधनात ठेवलेलं का? मी स्वातंत्र्य आणि मर्यादा समजून घेण्यात चुकले तर नाही ना?


पण लग्नापूर्वी हे अस नव्हतं. असं ही मला वाटत होतं.
मला अजून आठवतंय पिकनिकला गेल्यावर कधीही ड्रिंक न करणारा हा माझ्या आग्रहाखातर पहिल्यांदा प्यायला होता. त्यानंतर पुनः त्याला नको वाटलं ड्रिंक. पण त्याने मला तर कधीच अडवलं नाही. फक्त त्या रात्री काय झालं आठवत नाही, सगळ्याग्रुप सोबत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो एवढंच म्हणाला आता जेव्हा कधी हवी असेल फक्त माझ्यासोबत किंवा मी सोबत असेन तेव्हाच ड्रिंक कर. पण नको म्हणाला नव्हता.
कधीतरी गंमत म्हणून सिगारेटचा धूर ही काढला होता. तेव्हा तर उलट मला एकटीला कॉलेजच्या गच्चीवर इतकं रोमँटिकली उचलून नेलं होत आणि एक पॅकेटच हातावर ठेवलं होतं, घे फुक.
क्वचित तिथेच त्या सोबत काढला धूर दोघांनी. पण तेव्हा ही ना-नको-नाही काहीच नव्हतं.
त्याला मला साडीत पाहायला फार आवडत. साधं सरळ पंजाबी ड्रेस, मोकळे केस, कपाळावर बारीकशी टिकली अस कधी पुढ्यात आलं की एकटक वेड्यासारखा बघत राहायचा. पण त्याची आवड त्याने माझ्यावर कधीच लादली नव्हती. ना कधी कॅज्युअल घालण्यापासून अडवलं, ना मला हवे तसं वेस्टर्न ड्रेसेससाठी अडवलं. फक्त कधी कधी काही ठिकाणी किंवा विशेष एखाद्या दिवशी काही असेल तर आधीच सांगायचा. आज तो ड्रेस घाल वगैरे. मला ही आवडायचं त्याच्या पसंतीनुसार कधीतरी कडपे घालून वावरायला.
लग्नाआधी इतकं समजून घ्यायचा मग आता का असा वागतो. त्यावेळी मला दिलेलं स्वातंत्र्य तो अस कस हिरावून घेतोय. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत तो २४ तास माझ्यासोबत असायचा...
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत सोबत असायचा...
सोबत असायचा.... (अचानक चटका बसल्यासारखे सगळे विचार थांबले... एकच शब्द जिभेवर राहिला... सोबत असायचा)
तो सोबत होता. प्रत्येक वेळी. मी चूक केली तेव्हा मला सावरायला. ती सुधारयला. मी माझ्या नशेत असताना माझी काळजी घ्यायला. त्याने मला कधीच अडवलं नाही पण कधीच काही वाईट परिणाम नको म्हणून एकटही सोडलं नाही. त्याने माझ्या नकळत माझ्या मर्यादा कित्येक वर्षे जपल्या. आणि त्या मर्यादांना बंधनं समजून त्यावरच स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप करून त्याच्या प्रेमाचा अपमान केला.
मी चुकले. आज नाही नेहमीच. पण नेहमी सारख त्याने समजवल का नाही यावेळी. तो गाजवत असलेला हक्क आणि बंधन समजून घेता आल नाही मला. आणि माझं स्वातंत्र्य आणि मर्यादा यातला फरक ही नाही जपता आला.
मी ईथे कोर्टाबाहेर बसून आता विचार करतेय. स्वतःच्या चुकांचे पहाडे मोजतेय. माझ्या डाव्या बाजूला एक दरवाजाय जिथे न्यायाधीश बसलेत आमच्या संसाराची पत्रावळी वाचत. आणि उजवीकडे एक ज्या पलीकडे एखाद्या किनाऱ्यावर बसून तो लाटांशी बोलत असणार.
(मोठी घंटा वाजते. केससाठी आत बोलावणं येतं)

 आणि  आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...
दोन मार्ग. एक निर्णय.
आणि शेवटचा अर्धा तास!

- रोh@nj



Saturday, September 22, 2018

बाप्पाचा मेल आलाय...

प्रिय भक्तांनो,

          मला मानणाऱ्या न मानणाऱ्या समस्त पृथ्वी तलावर वावरणाऱ्या माणसंहो... गेल्या ११ दिवसांत तुमच्या भक्ती सोबत इतर अनेक गोष्टी माझ्याजवळ पोहोचल्या आणि न राहून हा मेल तुम्हाला पाठवावा म्हटलं. मेलंचं योग्य म्हटलं म्हणजे तो तुम्ही अगदी सहज स्मार्ट फोनवरही वाचाल आणि माझ्याचं नावाने ११ जनांना पाठवालं आणि नाही पाठवला तर अपशकुन होईल असा जगभर बोंबाटा करत सुटाल. नाहीतर आज्ञापत्र पाठवावं तर ते फरमान वाचायला तुम्ही वेळ द्याल की नाही कुणास ठाऊक याची वेगळी भीती.


          तर सुरूवात करतो माझा शाखा विस्तार केलात तिथून. म्हणजे पूर्वी २-४ किमी अंतरावर माझी स्थापना होती तर आता चौकाचौकात तूम्ही अमूक तमूक मंडळाच्या नावाने मला नेऊन ठेवता. वर त्यात भेदभाव ही तुम्हीच करता. पाहिलं तर सगळीकडे मीच; पण त्या पर्टिक्यूलर ठिकाणीच तुम्ही नवसाचा राजा म्हणून मला घोषित केलात. बरं आता तुम्हाला कितीही समजून सांगितलं तरी कळेना, "मी देवाऱ्यात नाही तुमच्या मनात वसतो". पण शेवटी तुम्ही मला दगडात आणि मूर्तीत शोधता आणि नवसाला पावणारा म्हणून त्यातल्याच एकाला घोषित करता. आता मला सांगा या सगळ्यांचं हेड आॅफिस तर मीच चालवतो. मग तुमच्या घरातला मी आणि त्या मंडपातला मी यात भेद का बरं? त्यापेक्षाही सांगायच तर मनात डोकवा तिथेही मीच आहे.

आणि नवस म्हणजे काय हो लेकरांनो. तुमची एखादी इच्छा मांडता बदल्यात मलाच काहीतरी अमिष दाखवता आता तुम्ही मला सोनं, चांदी, ५-२५ नारळं वाहणार ते घेऊन मी कुठं बरं जाणार. स्वर्ग लोकांत या साऱ्याची बिलकुल गरज नाही मला. इतकं सारं ओझं, सोन, चांदी, पैसे, अमाप संपत्ती तुम्ही माझ्या वेगवेगळ्या शाखांत भरता पण कधी पाहिलात का मला ती घेऊन जाताना? नाही ना! मग मी मागितलं नसताना का बरं देता?

मला तुमच्या भक्तीची अन् मोदक, जास्वंदाची तेवढी भूक. तेही तुम्ही २१ मोदक देता ते जेव्हा २१ भक्त ग्रहण करतात तेव्हाचं माझ्या पोटी लागतं. इतर मला काही नको असतं. आणि राहिल्या तुमच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न जर ती योग्य असतील तर नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतोच. पण तुम्ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर किंवा नशीबावर टाकाल तर मी तरी काय करणार यात.


अभ्यास न करता विद्यार्थ्याला निकाल कसा लाभणार. किंवा डाॅक्टरी इलाज न करता एखादा आजार बरा कसा होणार. माझा वाटा केवळ १ टक्का बाकी तुमचे प्रयत्न असावेत. तुमच्या प्रयत्नाला माझी साथ असतेचं.
पण तुम्ही मला नवस बोलायला माझ्या शाखाही स्वतः ठरवता. तासनतास लाईनही तुम्हीच लावता आणि पुन्हा त्यात वादविवाद करून भांडताही तुम्हीच. मग कधी पोलीसांवर हल्ला तर कधी कार्यकर्त्यांवर. पण या सगळ्यांत माझा भक्त कुठेय?
बरं मग त्यातही तुम्ही नवसाची रांग, तर कुठे वि. आय. पी. तर कुठे पास विकुन रांग लावता. माझ्यासाठी सारे सारखेच तुम्ही बाळांनो. मी कधी भेद नाही केला. मग तुम्ही का अस विभागून येता माझ्याकडे...
या रे या सारे या... एक दिशेने एक मताने या...

आणि हे... हे बघा! आता यावर काय बोलू मी. अरे माझी उंची तुमच्या एवढीचं. त्यात हे उंदीरमामा आमचे एवढेसे. माझ्या ६ फुटाचे १२-१५ केलात तीथवर ठिक. हळूहळू वाढवत आता २२-२५-३० फूटावर नेऊन ठेवलात माझी उंची. अरे इतक्या वरून माझ्या भक्तांना पाहताना किती त्रास होतो मला आणि त्यात तुम्ही आधार देऊन उभ करता आणि त्यात माझा तोल जाण्याची ही भीती. एक अपघात ओढवला होता, आठवतय ना...


माझ्या किर्तीची उंची तुमच्या मनात साठवा पण मूर्ती मात्र जरा मापातचं असू़द्या... त्यात त्यांच्याचौकात इतकी मोठी म्हणून आपल्या चौकात चार फूट वाढवून बसवू नका. त्रास शेवटी मलाच होतो. आणि नको त्या गोष्टीत का म्हणून तुम्ही स्पर्धा करता. मूर्तीची उंची, मंडळाचे नाव, आगमन, विसर्जन, नवसाला पावणारा अरे या साऱ्यात स्पर्धा कशासाठी.
सामाजिक उपक्रमांत स्पर्धा करा, चलचित्र देखाव्यात स्पर्धा करा, ज्या स्पर्धांतून समाजहित साधेल, सामाजिक उपदेश जाईल, सत्कार्य घडेल. अशा स्पर्धा करा. त्यांनी एक सत्कार्य केले तुम्ही चार करा. पण तुम्ही अडता फक्त मंडळाच्या खोट्याा प्रतिष्टेसाठी. आणि लावता मग आगमन, विसर्जन अन् कोणी मुंबईचा तर कोणी नवसाचा राजा. हे एवढ मार्केटिंग कशासाठी हवं मला. माझे काॅपीराईट आणि ट्रेडमार्क घेण्याइतपत तुम्ही मोठे झालात का?

डिे.जे., ढोल यांच्या प्रमाणा बाहेरील धिंगाण्यात गर्दी वाढवून काय सिध्द करायचंय तुम्हाला... परवा आगमनाला काय झालं पाहिलात? मी शांतच बसलो होतो. कोण कोण कुठून लांबून आलं होतं. मला पाहण्यासाठी कि नुसत त्या गर्दीत उड्याामारून नाचण्यासाठी? रोड डिवायडर, सरकारी बस, प्रायवेट गाड्याा सगळ्यांवर चढून बसलात तुम्ही. शेवटी काय लागलं हाती...
सामान्यांची चेंगराचेंगरी, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि कलाकारांनी सादर केलेल्या वास्तू जमीनदोस्त. यावर तातडीने उपाय करत माझ्या भक्तांनी आपली चूक सावरली खरी, त्याच मला अपु्रपच आहे. पण याला जबाबदार कोण? मी की तुम्ही?


वरून घडलेल्या घटनेचा अपप्रचार करून तुम्ही माझचं नाव अगदी धुळीस मिळवता. एखादी दुर्घटना किंवा तुमच्या वागणुकीने घडलेली चूक तुमच्यातलेच काही हितचिंतक तातडीने फोटो काढून त्यावर भरमसाठ काहीतरी लिहून मोकळे होतात. आणि जाहिर करतात हाच का गणेशोत्सव? हीच का श्रध्दा?
म्हणजे चूक करणारेही तुम्हीच आणि प्रश्न करणारेही तुम्हीचं. पण अशाने तुमच्याच समाजात आस्तिक-नास्तिक आणि जाती विरूध्द दंगे होण्याची मलाचा अमाप भिती. कारण अशा संवेदनशील गोष्टी योग्य पध्दतीने पोहचवणारा हितचिंतक असतो पण त्याचा वणवा पेटवून परिस्थिती बिघडू पाहणारा हा समाजकठंक असतो.
अशी विचारधारा असणारे अस वाटतं माझं अस्तित्व मिटवण्यास जणू वाटचं पाहत असतात.

          आता कालचं आमच्या नारदमुनींनी एक विडीयो पाहिला. त्यात चौपाटीवरील विसर्जनानंतरचे दृष्य कैद होते जे अतिशय दुदैवी परिस्थिती मांडत होते. शिवाय एक असही चित्र होते कि एका भल्या मोठ्या ट्रकमध्ये माझ्या असंख्य मुर्त्या एका खाडीत फेकल्या जात आहेत. खर तर हा अनुचित आणि चुकीचाच प्रकार. उत्सवाचं हे रूप पाहिल्यावर कोणीही टिका करणारचं. पण ते सोशलमिडीयावर वायरल करून काय बरं साध्य होतं? म्हणजे करणारे ही तुम्हीचं आणि दाखणारे ही तुम्हीच. त्यावरचे उपाय का नाही बरं करतं. तुमच्या संपूर्ण गाव-शहराच्या लहान आणि मोठ्या माझ्या प्रतिमूर्ति तूम्ही चौपाटी व समुद्रकिनारी विसर्जित करता त्या पी.ओ.पीच्या अविघटक मुर्त्यांचं ग्रहण समुद्रदेव किती बरं करणार. त्यांनाही पाण्याखालील जीवसृष्टीची काळजी असेलच की, मग या साऱ्या लहान मोठ्याा मूर्ति समुद्र देव किती अन् कशा उदरात सामावून घेणार. त्या पुन्हा किनाऱ्यावर येणारचं आणि तिथून उचलून एखाद्याला त्याची पुन्हा विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावावी लागणारचं.


विसर्जनानंतर जणू त्यातलं अस्तित्व संपूण तो पुतळा कसा कुठेही भिरकावला गेला तर यात नवल काय हो? कारण तुम्हाला ही संपूर्ण सृष्टी, हीची काहीच पर्वा नाही. नाहीतर तुम्ही माझ्या लहान आणि इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून, कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचा समतोल राखणारा उत्सव साजरा केला असता. पण तुम्ही एका हाताने चुक करता अन् दुसऱ्या हाताने तेच फोटो काढून त्यावर टिका करता, गालबोट मात्र मलाचं लागते. हाच का टिळकांचा गणेशोत्सव.


         टिळकांनी असा कधी स्वप्नातही विचार केला नसेल बाळांनो असं विचित्र रूप तुम्ही माझ्या उत्सवाला आणलयं. मला आठवतयं लोकमान्य टिळकांनी १८९३ साली घरातला सण दारात आणला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र पूर्व काळात लोकांनी एकत्र यावं, स्वतंत्र्याची धोरणं आखावित क्रांतिकारक योध्दे तयार व्हावेत; अशी सुगम, स्वच्छ धारणा त्यामागे होती. समाज हिताची विचारसारणी होती. उत्सवाला सांस्कृतिक आणि सामाजिक धारणा होती. पण आज हे सारं चित्र बदललयं भक्तांनो. हे थांबायला हवं. माझ्या नावाने चालणारी ही स्पर्धा, मार्केटिंग अन् खोट्या भक्तीची दुकानं बंद करा. वेळ आहे तोवर सावरा. नाहीतर प्रलय येईल. तेव्हा विघ्नहर्ता म्हणून मला काहीच करता येणार नाही. कारण तेव्हाही तुम्ही एकजूटीने बदलण्याचा नाही, तर प्रत्येक चौकातल्या मंडपाच्या माझ्या मूर्तीतच मला शोधाल आणि मी मात्र इथे तिथे कुठेच नसेन कारण मी फक्त एक दिव्य शक्ती आहे. जी सर्व निसर्गात आहे अन् तुमच्या मनात आहे. तर ओळखा माझं खर रूप आणि बदला हे उत्सवाचं स्वरूप.

तुमचा लाडका बाप्पा... 




Sunday, August 12, 2018

Attachमेंट

#Documentary film shoot

मध्यंतरी एका डॉक्युमेंटरी फिल्म निमित्त बऱ्याच जागी फिरलो. त्यातला एक दिवस हे प्रेमी जोड दिसलं. इतरांशी सहज बोललो माहिती घेतली पण त्यांच्या बाबतीत त्यांना अडवलं किंवा विचारणं जमलं नाही.. त्यांना पाहून फक्त एक समाधान वाटत होत आणि त्याच्या एकत्रित पडलेल्या प्रत्येक पुढच्या पावलाला वाटत होत माझंही आयुष्य असंच सोबतीत जाईल ना???
ते एकमेकांना सावरत तिथून हळूहळू निघून गेले त्यांच्या कल्पनेत खूप लिहावं वाटलं पण नव्हतं जमत शेवटी ते जोडपं आणि सध्याची सत्य परिस्थिती यांचा संदर्भ कुठे तरी लागला आणि हा ब्लॉग पूर्ण झाला...
जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम केलंय तर नक्कीच वाचा आणि पुढेही पाठवा.

#jagadamb #jentertainment #rohanj



मी आता मनावर दगड ठेवलाय. मी त्याच्याशी बोलणारच नाही. का म्हणून सारखं मीच म्हणून नमतं घेऊ. नात्याची प्रेमाची गरज काय फक्त मलाच होती का?
आणि तो त्याला काहीच नकोय का? नावापुरती आहे का हे नातं? प्रेम करतो म्हणे?
प्रेम असत तर असा वागलाच नसता.
मी इतकं करून सुद्धा माझ्याशी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलला माझ्यावर हात उगारला...
नको आता असलं जबरदस्तीच नातं. पुरे झालं आता हे, आता हे थांबणार! मी संपवणार सगळं.

कालचा दिवस...

ती - रिंग वाजतेय, (मनात - किती फोन लावले हा उचलत का नाहीय, हल्ली खूप बदललाय हा... पूर्वी मिसकॉल जरी असला तरी धावत पळत यायचा आता फोन उचलायला ही टाइम नाहीय.)

तो - फोन कट करतो.

ती - रागावून फोन आपटते आणि कामात अडकवून घेते.
(तरीही पुन्हा सारखी त्याचीच आठवण)

तो - रात्री सगळं आटपून फोन करतो.

ती - (एकदा उचलत नाही दुसऱ्यांदा कट करते)

तो - text msg करतो. तू नक्की सिरीयस आहेस ना आपल्या रिलेशनशिपबद्दल. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर??

ती - वाचते आणि थंड पडते... हा अस कस मलाच विचारतोय. चूक स्वतःची असून मला का बोलतोय. तिचा जीव कासावीस होतो आणि चटकन कॉल करते.

तो - मुद्दामच उचलत नव्हती ना? म आता का फोन केलास? की मी सोडून दुसरीकडे कुठे बीसी होतीस? माझं प्रेम कमी पडल का ग... (तो रागात बरच काही सुनवतो)

ती - (उदास होते, डोळे भरून येतात) हे तू म्हणतोयस. ज्याला स्वतःला माझ्यासाठी अजिबात वेळ नाही. एखादा फोन किंवा मेसेजवर तासभर बोलावं म्हटलं की तुझ्याकडे वेळ नसतो. सतत टाळणारा तू मलाच विचारतोय सिरीयस आहेस की नाही की मन भरलं सगळ करून आता...

तो - रागाने शिव्या देतो. भडकतो. रात्रभर दारू पितो. सकाळी तिचा न वाचलेला msg दिसतो. तू खूप बद्दललायस. (तिरस्कारी हास्याने तो खिडकीत उभा दात घासत असतो)
त्याची नजर घरा समोरच्या झाडावर जाते. चाफ्याच्या फुलांनी बहरलेल्या त्या झाडाकडे पाहून तो सगळं विसरून जातो आणि तिच्याबद्दल काही झाडाखाली बसून घालवलेले क्षण आणि आंबट गोड आठवणींनी हसू लागतो. नुकतंच आठ दहा महिन्यांचं गोड निरागस प्रेम होतं. मन जुळली आणि गुंतण झालं पण ही वेळ का आली त्याच त्यालाच कळलं नाही.
तो पुन्हा आठवणीतून बाहेर येत तोंड धुवून झाडाखाली बसलेल्या माळ्याकडे जातो.
बाबा आज झाडाला पाणी नाही घातलं?



बाबा - तुला कस माहीत मी याला खत पानी करतो ते.

तो - बाबा मी लहानपणापासुन तुम्हाला बघतो, रोज तुम्ही याला पाणी घालता न चुकता, काळजी घेता. खूप छान वाढवलायत हे झाड. पाहिलं तरी मन प्रसन्न होतं.

बाबा - त्याच्याकडे पाहून हसतात

तो - कायझालं बाबा हसताय का?

बाबा - काहिनाही बेटा! तुला आठवतंय का तू मला शेवटचं खत पाणी करताना कधी पाहिलंस. खर तर तुझ्या कामातून आणि रोजच्या धावपळीतुन तुला समजलंच नाही गेले 8-10 वर्ष मी या झाडाला खत पाणीच केलं नाही. कारण ते आता तितकं मोठं झालंय की त्याला आता रोज सांभाळण्याची गरज नाही. कारण योग्य वेळी मी त्याला त्याला हवं असलेल खत पाणी अन माझा वेळ देऊन त्याची निगा राखली आणि बघ आज ते इतकं बहरल आहे आणि छान फुल देऊन मला प्रसन्न तर करतच पण माझ्या म्हातारपणात आता माझा सोबती बनून मला साथ ही देत.

तो - म्हणजे बाबा तुम्ही पाणी न घालता हे जगतय? काही कळलं नाही.

बाबा - बेटा योग्य वेळी त्याला खत पाणी केल्याने आता त्याची मुळं इतकी मजबूत झालीयत की त्यांनी मातीशी आणि माझ्याशी नाळ जोडलीय. आता ते असच वाढत आणि बहरत जाईल. आता रोजच्या रोज त्याला मी गोंजारल नाही तरी त्याला जाण राहील आणि तो माझ्यावर अशीच माया राखील.
(बाबा उठून जाऊ लागले)

तो - (आयुष्याशी गोष्टींचा संदर्भ लावत, विचारात हरवून गेला)

बाबा - जाता जाता मागे फिरले आणि म्हटले, बेटा... नात्याचंही तसंच असतं. आणि निघून गेले.

तो - ???



या घटनेला आज 50 वर्षे लोटून गेली...
आज आमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव झाला.
त्या दिवशी तो इतका विचित्र वागला की मला आठ दहा महिन्यांचं कवळ नातं तुटल्यासारखं झालं... रात्रभर रडले आणि दुसऱ्यादिवशी तो घरी येऊन आई बाबसमोरून हाताला धरून घेऊन गेला जिथे त्याने मला प्रपोज केलं होतं. तिथेच तसाच गुडघ्यावर बसून त्याने माफी मागितली आणि घट्ट मिठी मारून रड रड रडला. त्या दिवसानंतर त्याने कधीच मला दुखावलं नाही. दोघांच्या प्रेमाचं खत पाणी आमच्या नात्याला इतकं मिळालं की वर्षभरात आम्ही लग्न केलं आणि आज आमची हाल्फ सेंच्युरी झाली.

आमचं हे नातं असच टिकून आहे आमच्या शेवटापर्यंत कारण त्याने माझी एकमेव इच्छा पूर्ण केली...

नको मला चंद्र नको मजला तारे,
हातात हात घेऊन सोबत शेवपर्यंत जगूया ना रे...

- रोh@nj







Monday, July 9, 2018

प्रवास

रात्रीची ११ ची वेळ. मुसळधार पाऊस. तो त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहोचला. मागे पाहिलं मनात पुटपुटला...
"पेहले मौत हमारे पीछे भागती थी, 
अब हम मौत के पीछे भागते है...
कमबख्त ऐट तो देखो उसकि,
अब गले भी नहीं लगाती..."


मुंबई. सर्वांना आपलं करणार शहर. पावसाचा मौसम. सकाळपासूनच जरा पावसाने जोर धरलेला. रविवारचा दिवस असल्याने सर्व कामे निवांत होती. छोटी मोठी हातासरशी आवरून त्याने निघायच ठरवलं. त्याला भर पावसात २५ किमी अनोळखी रस्ता कापायचा होता. प्रवास तसा जेमतेम तासाचा. पण पावसाने खुळंबा होणार हे निश्चित होत. ताशी ३०-४० च्या वर जाणं शक्य नव्हतं. घाई करणं ही चुकीचं होत. महत्वाची मिटिंग होती. आज काम पूर्ण होणं गरजेचचं होतं. गाडी सुरू झाली. पावसाच्या सरी इतक्या प्रेमाने समोर पडत होत्या की समोरची परकी गाडी तिच्या पुढे दिसत नव्हती. इतकं पांढर शुभ्र प्रेम पसरलं होत की फक्त तो अन् पावसाची सर. तिचे टिपूरे बरसणारे दाणे हेल्मेटच्या आत त्याच्या गालाना स्पर्शू लागले. सरीच्या इतक्या प्रेमाने त्याचे डोळे मिचकत होते. कारण आता सरी नेत्रांचेही चुंबन घेऊ लागल्या होत्या. तो पोहोचला. योजिले कार्य संपन्न झाले.
        आता तो निश्चिंत होता. कायतरी मनात बोचत होत. परिस्थितीने निडर झालेला अन् स्वभावाने शोधक असलेला तो कायतरी डोक्यात घोळत होत त्याच्या. पण विषय नेमका काय हे त्याच त्याला ही कळेना. संध्याकाळ झाली. ८ च्या सुमारास त्याने परतीचा प्रवास सुरु केला. पावसाच्या सरी तितक्याच प्रेमाने बरसत होत्या. आज दिवसभर त्यांचं प्रेम किंचितही कमी झाल्याचं जाणवलं नाही. सिग्नल लागला आणि "थोडक्यात वाचला रे"...


त्याच्या समोरच एक दुचाकीस्वार आडवा झाला. एक बाजूला गाडी दुसरीकडे तो फेकला गेला, रस्त्यात पडला असता तर...
नशिबानं बचावला. पुढ्यातला सारा प्रकार पाहून त्याचे तारे चमकले. "यस हेच ते", त्याला बोचनारा विषय सापडला. दररोज मुबईत कितीतरी अपघात होतात, त्याला जबाबदार कोण?
स्पीड, पाऊस की रस्ता...???

त्याला किक मिळाली, सिग्नलला उभा तो, दिवा हिरवा होण्याआधीच सुसाट सुटला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला.
पाऊस तितकाच मुसळधार होता. वाटेवर अंधाराची चादर पसरली होती. रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता. पण वाहनांची वर्दळ होतीच. आता तो ६०-८० च्या दसरम्याने गाडी उडवत होता. झोम्बणारा वारा... पावसाची बसणारी चपराक... अर्धा ओला तो... त्याला काहीच जाणवत नव्हतं. कारण तो घरच्या दिशेने नाही त्याला पडलेल्या प्रशाच्या दिशेने धावत होता...
        १०० मीटरच्या पुढची गाडी आणि रस्ताहि दिसणं कठीण होत. सगळा काळोख. रस्त्यावरील दिवे काही ठिकाणी निजले होते. पण गाड्यांच्या प्रकाशाने थोडं दिशा देता येत होती. आणि तितक्यात...........
त्याने क्लज-ब्रेक दोन्ही एकसाथ आवळले. पाय रस्त्यावर उतरवले. गाडी टोकाला येऊन थांबली. भर वेगातली गाडी आणि वेग कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न टोकाला येऊन यशस्वी झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. पण मागे पाहिलं तर दुसरी गाडी त्याच्या गाडीची गळाभेट घेऊन मोकळी झाली होती.
स्पीड टेस्ट कम्प्लिट...


हा अनुभव खिशात घेऊन तो पुढे निघाला.
तो पुन्हा धावू लागला. गाडीचा वेग तितकाच आणि पावसाचाही. आता पावसाशी लढत होती. आता अंग ही गारठल होतं. शरीर थोडं थकलं होतं पण डोकं त्याच शोधात. पाऊस आणि धुक्यात रस्ता हरवू लागला होता. आणि एका वळणदार वाटेवर..........
त्याचा श्वास फुलला. गाडी कशी बशी आवरली. पण जवळपास ती आडवी झालीच होती. गुडघा आपटला. तेवढ्यावर निभावल. कारण ओल्या रस्त्यावर वेगाने घेतलेली वळणदार वाट.. गाडी स्लिप झाली म्हणजे टायर अचानक फिरलं. सुदैवाने पूर्ण आडवा न होता त्याने गाडी कंट्रोल केली. पुन्हा सावरल. एक लांब श्वास घेतला. पुढल्या वाटेला लागला.

आता थोडा मार लागल्याने तो खचला होता. पण किरकोळ असल्याने ...तला किडा काही मेला नव्हता. तो पुन्हा वेगाला कापत निघाला. स्पीड आणि पावसासोबत जिंकल्याचा घमण्ड त्यात दिसत होता कदाचित. आता शेवटचा टप्पा होता. रस्ते.
पर शायद यहाँ उसके रास्ते लगने वाले थे...
‌तो आता अवघ्या १५-२० मिनिटांवर घरापासून लांब होता. थोडा जोशात होता. मनातली कोडी सोडवत असताना त्याला साऱ्याचा विसर पडला होता. बेभान होऊन तो रस्ता कापत होता आणि अचानक गाडी खाडकन खाली बसली... परत उडाली.. अडखळली.. वळाली.. लडखडली.. उजव्या बाजूने झुकली. तो वाकून चाकाकडे पाहून जरासा वर सरकला आणि १००च्या वेगाने आलेला ट्रक त्याच्या तोंडासमोरून जवळपास हेल्मेटला घासून त्याच्या दुचाकीचा आरसा फाटकन तोडून निघून गेला.
श्वासाचा वेग हजार पटीने वाढला. गाडी सोडून तो कडेला जाऊन उभा राहिला. सुन्न. काही कळत नव्हतं. या ५ सेकंदात काय घडलं काही समजलं नाही. पावसाच्या ओलाव्यात फटलेला घाम दिसत नसला तरी मनातली धडधड जाणीव करून देत होती. पहिल्या दोन वेळी मरण हुलकावणी देऊन गेलं. पण तिसऱ्या वेळी...
मौत छुके निकल गई थी!


पावसाचे शिंतोडे तोंडावर पडले. हरपलेली शुद्ध परतली. डोळ्यासमोर एक न दिसणारा खड्डा, त्यात अडकलेली गाडी, साचलेलं पाणी एवढचं दिसत होतं.
मागचा सारा प्रवास डोळ्यासमोर आला. वेगाबरोबर जिंकलेली शर्यंत, पावसाशी केलेले दोन हात... सगळं आता पावसाच्या पाण्यात वाहून गेलं.
तो स्थिरावला. घरी पोहोचलो. गाडी लावली.

रात्रीची ११ ची वेळ. मुसळधार पाऊस. तो त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहोचला. मागे पाहिलं मनात पुटपुटला...
"पेहले मौत हमारे पीछे भागती थी,
अब हम मौत के पीछे भागते है...
कमबख्त ऐट तो देखो उसकि,
अब गले भी नहीं लगाती..."

तो गाडी लावून घरात निघाला आणि स्वतःला म्हटला.
किस्मत सबको ३ मौके नहीं देती..!!

When he started journey his speed was  between 60 to 80 kmph during heavy rain with the bad condition of roads.
But when he reached...
The condition of road, Force of rain...
And his speed was........................
U Decide Your Own Destiny!


जन हित में जारी... Drive Safely!!

- रोh@nj



Wednesday, February 14, 2018

पत्र... तिच्या परतीसाठी!!

आज ३ महिने ३ दिवस झाले, त्याच्या नि तिच्या भेटीला. तो नेहमी येतो, तिच्या आठवणींना गोंजारतो, तिने दिलेल्या क्षणांत रमतो आणि त्या चौपाटीवरच्या प्रत्येक गोष्टीशी बोलतो. 
त्याही त्याच्याशी बोलतात (त्याला वाटत), त्याला प्रश्न करतात?
आणि तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, फोन लागत नाही, 
whatsapp ला लास्ट सीन पाहतो, तो शेवटच्या भेटीचा. 
फेसबुक वर त्याच भेटीचा शेवटचा सेल्फी. 
तो रडतो, रडत रडत वहिच एक पान फाडतो आणि लिहू लागतो!

पत्र... तिच्या परतीसाठी!!

प्रिय,
तू...

"तुला आठवतेय आपली शेवटची भेट, तो समुद्र किनारा, त्या उसळणाऱ्या लाटा, ती सळसळणारी रेती अन् त्यात रुतलेले आपले पाय. तू विसरली अशील कदाचित,"
मी नाही विसरू शकलो. कारण त्या चौपाटीच्या रेतीतला कण कण आणि वाहणाऱ्या पाण्याची प्रत्येक लाट मला आजही प्रश्न करते. "तू तिला थांबवलं का नाहीस?"
त्यांना कुठे माहीत, की जाताना तू सांगितलंच नाहीस. तुला माहिती होत जर तू म्हटली असतीस ही आपली शेवटची भेट, मी मनाशी कवटाळून धरलं असत तुला - आयुष्यभर, कधीच सोडलं नसतं!
तुला माहीत होत ना हे, म्हणून तू लपवून ठेवलस सार माझ्यापासून...


"अचानक एखादं पालवी फुटलेलं झाड मुळावर घाव करून संपवाव. असं नात कोलमडून पडलं ग आपलं. तुला जाताना प्रश्न करावे वाटले नाहीत? जाणून व्हावं वाटलं नाही? सत्य काय हे ही शोधावं वाटलं नाही. तू फक्त निघून गेलीस. अशा वाटेवर जिथून तू परतलीच नाहीस."

मी आता तिथेच बसलोय, नाही सोबत कुणीच नाही ग. अगदी एकटाच बसलोय, आपल्या काही आठवणींसोबत. जिथे अगदी शेवटची भेट झाली तिथेच आणि पहिली भेट ही इथलीच ना ग?
म्हणजे एकंदरीत सुरुवात नि शेवट त्याच जागी त्याच भेटीत करून गेलीस असंच ना? म्हणजे जिथून दोघांचा प्रवास सुरु झाला तिथे पुन्हा येऊन एकटा सोडून गेलीस.
का तुझ Destination काही वेगळं होत का? की प्रवासात माझा सहवास नको झाला तुला?
की माझा कंटाळा आला होता? नाही, मग तुला कोणी माझ्याही पेक्षा जास्त जीव लावला का?
मग तुला खेळायचं होत का ते tp म्हणतात तस काही?
हे पण नाही, मग मी कुठे चुकलो होतो का?
अग सांग, सांग काहीतरी..... सांग काहीतरी....
हे प्रश्न मला कोड्यात अडकवून संपवतायत ग. का गेलीस तू? का गेलीस?


तुझी प्रत्येक गोष्ट आजही मी तशीच जपलीय. बांधून घेतलंय मी स्वतःला तुझ्याशी. तुला ही आवडायचं ना ते. सतत मी तुज्याबद्दल बोलणं. काळजी करणं. तुझ्यासाठी काहितरी करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझा आवडता हट्ट, 'माझ्यासाठी लिहिना', किती लाडाने म्हणायचीस. अगदी आपल्या पहिल्या भेटीवर सुद्धा लिहायला भाग पाडलं होतंस.
आठवतंय ना, एखाद्या लहान बाळासारखा हट्ट होता तुझा.
"मी वाट पाहते, दोन...चार... हवे तितके दिवस, तू लिहिपर्यंत".

PC : Instagram

तुझ्या डोळ्यांत पाहिल्यानंतर खरं तर तिथेच लिहावं वाटत होतं. त्या डोळ्यांतली चमक शब्दांत उतरवण्याची इच्छा मलाही झाली होती. पण अडवलं होत स्वतःला आणि नजर फिरवली होती. तिथून परतल्यावर मात्र शब्दांनी हात धरला अन् तुझ्यासाठीची पहिली कविता गिरवली. अगदी त्याचं दिवशी मध्यरात्री. पण तुझा हट्ट असूनही तुला ती दाखवली नाही, कारण हे का लिहिलं हे माझं मलाही तेव्हा कळलं नव्हतं. आणि तुलाही ते किती आवडलं असत नि पटलं असत माहीत नाही. शिवाय मी प्रेमात वगैरे पडलोय समजून तुही दूर केलं असतीस की तुझ्याही मनात तेच होत कल्पना नव्हती. हो पण एखाद्या विषयी लिहायचं म्हटलं की त्या व्यक्तीच्या अंतःकरणात शिरून स्वतःच्या नसा नसांत तीच अस्तित्व जागवावं लागत. तेव्हा शब्द खाणीतून बाहेर पडतात. तुझ्याबाबतीत तेव्हा. तस काही होत की नाही माहीत नाही. पण त्यांनतर शब्द उमटले ते फक्त नि फक्त तुझ्यासाठी.
तुझ्यासाठी लिहिणं हा छंदच झाला. तुला हि तर वाचनाचा लळा लागला होता.

माझ्या कविता तुझ्या आवाजात किती सुरेख वाटायच्या ना. तुझा तो चिमणीसारा आवाज आणि त्याला कोकिळेचा सूर अस वाटायचं. तुझा तो आवाज कैद आहे माझ्याजवळ. तुझ्या आठवणी मनात हैदोस घालतात तेव्हा तोच साऱ्यावर पांघरून घालतो. पुन्हा ऐकव ना माझीच एखादी कविता, तुला आवडलेली. तुझं आवडत, ते गाणं गुणगुणायचिस ते. मनापर्यंत पोहचव ना तुझा आवाज पुन्ह्यांदा!
तुला माहितीय सूर्याच्या कोवळ्या किरणाबरोबर येणारा तुझा पहिला फोन,


झोपेतून उठल्यावर अगदी २-४ वर्षाच्या बाळासारखा बोबडा येतो ग आवाज. एखादं छोटंसं बाळ आपल्या जवळ बोलवतय अस वाटायचं. तुझ्या आवाजातला संपूर्ण गोडवा पहाटे मनात उतरला की माझा दिवस ही छान गोड व्हायचा. एकदा साद घाल ना त्याच गोड बोबड्या आवाजात.

नाही ऐकवलंस तरी रागावणार नाही ग मी. तू नेहमी म्हणायचीस ना मी short temper आहे, पटकन राग येतो, बघ ना आता मला रागच येत नाही अगदी कुणीही मारल, बोललं, कितीही छळल तरी. अगदी पूर्वीसार कुणी खोट वागलं विश्वासघात केला तरी त्यावर रागवत नाही. उलट आता तस झालं की मला माझाच राग येतो.
किती तरी वेळा म्हणायचीस, "चिडू नकोस ना रे, पटकन का रागवतो...!",
तू जाताना सगळा राग घेऊन गेलीस का? हल्ली तुझ्या सारा तो ही येत नाही!
त्या रागानेच संपवलय का आपलं नात?


कदाचित तू गेल्यावर मला नात्यांची किंमत कळाली. हल्ली वादच होत नाही फार म्हणजे मी संवादच नाही ग ठेवला फार कुणाशी आणि जे आहेत ते तुझ्यासारखे नाही पण समजून घेणारे आहेत. म कधी राग आलाच तर गमावण्याची तरी वेळ येणार नाही. पण खूप त्रास होतो ग. कारण तशा परिस्थितीला मला सावरायची शांत करायची Technique तुझ्याकडेच होती. अगदी झटक्यात दगडाला पाझर फोडायचीस.
या आठवणींनी तुझं मन नाही का ग पाझरलं?

आपण एकत्र घालवलेला वेळ तिथेच थांबला असता तर, ते चित्र किती रंगीत झालं असत.
तो दिवस किती छान होता लांब रस्ता आणि कुठे जायचं याचा दोघांनाही पत्ता नव्हता. कुठे जायचं माहीत नसताना, तुझ्या सोबतीत तो प्रवास किती रमणीय होता ग. गाडीतून जाण्याची इच्छाच तेव्हा मेली जेव्हा रस्ता क्रॉस करताना झटकन तू हात धरलास, खरं तर माझी ही इच्छा झाली होती ग, पण नात्याच्या सुरुवातीलाच अस् वागणं तुला पटलं नाही तर... पण तू पकडलेला हात मी घट्ट धरला अन् नकळत तो प्रवास संपेपर्यंत तसाच राहिला. मी ठरवून नव्हतं केलं. फक्त त्याचा आधार वाटला होता. तुलाही त्या स्पर्शाची भाषा कळाली होती ना?
मग अशी हात झटकून कुठे निघून गेलीस ग?


तुझ्या सोबतीतला प्रत्येक क्षण मनात वृंदावनासारखा बहरलाय अन् अत्तरासार गंध पसरतोय. तुझ्या भेटीतले अन् मिठीतले क्षण तुझ्या आवाजाइतकेच गोड नि मनात कैद आहेत. तू परत येऊ शकत नाहीस. पण मी तुझ्या पर्यंत पोहचण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तू जवळ करत नाहीस आणि पुन्हा या माणसांच्या गर्दीत मला भिरकावून देतेस. पण मी येईन एक दिवस तुझ्याजवळ.
काळजी घे, पुन्हा येतो! तुझ्या आठवणीत थोड लिहून जातो!

आठवण येते तुझी,
रिमझिम रिमझिम सरींसारी
पावला पावलाला साथ सोडून
मनाचा रस्ता मात्र ओलावणारी...
आठवण तुझी ||

कधी मुसळधार होऊन,
अंगभर शहारणारी
तर कधी कडाक्याच्या उन्हात
भेटीची आस लावणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
उन्हामधल्या पावसासारी
मनाला चटके देऊन
डोळ्यांना मात्र भिजवणारी...
आठवण तुझी ||

कधी दाटल्या आभाळापरी,
सांज ओली करणारी
तर कधी विजेच्या कडाडात
मनाला कोरा साद देणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
वाहणाऱ्या लाटांसारी
मनाच्या किनाऱ्यावर आदळून
परतीची वाट मात्र धरणारी...
आठवण तुझी ||

कधी दुष्काळी मनात,
भावनेचा पूर आणवणारी
तर कधी त्सुनामीसारी
मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात उसळणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
अशीच सतत सतावणारी
मोडक्या स्वप्नांनकड पाहून
माझ्यात तुझे अस्तित्व जगवणारी...
आठवण तुझी ||

आजही येते, आठवण तुझी
तुलाही येईल का कधी
अशीच आठवण ... माझी
उन्हा पावसाला एकत्र करून
आयुष्याला इंद्रधनुष्यात रंगवणारी...
आठवण..... तुझी माझी ||

येईल का कधी आठवण तुलाही
आपल्या त्या निनावी नात्याची ||

तुझा,
मी,

त्याने शब्द आवरते घेतले अन् पत्राला पूर्णविराम दिला. ते एका envelop मध्ये घातलं. त्यावर पत्ता लिहिला. तो उठून पाण्याच्या दिशेने चालू लागला. पाणी कमरेच्यावर लागलं. तो सुन्न भिन्न होता, चालतच होता. एक उंच लाट आली आणि तो लाटेसोबत बाहेर फेकला गेला. पोलिसांनी ताब्यात घेतलं नि घेऊन गेले. ओसरत्या लाटेकडे तो मागे फिरून बघत होता, जाताना लाट हातातल पत्र भारकन घेऊन गेली.

पत्रावर पत्ता होता... देवघर!


All PC : Google

To be continued....



Monday, January 15, 2018

जातीचं प्रेम... विध्वंस!

प्रकरण! अगदी योग्य शब्द वापरलास. खरंच जगाचं ते प्रेम. मी केलं ते प्रकरण.

अरे, मला तस म्हणायचं नव्हतं.
मी सहज बोलता बोलता...

असू दे. काही चुकीच नाहीच त्यात. घडलंय ते प्रकरणचं म्हणावं लागेल. कारण प्रेम वगैरे काही त्यात नव्हतंच. मुळात माझ्यासारख्या वेडसर मुलावर कसं कोण प्रेम करेल. आमच्यासारख्यांनी फक्त नि फक्त या गोष्टी लांबूनच पाहाव्यात. जवळ गेलं की काट्यासाऱ्या अंगभर बोचतात त्या...
(मी शांत झालो)

तो - बोल...

मी - ती माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिचा मी हात पकडला, जिच्या सोबत मी चौपाटीतल्या वाहत्या रेतीत चाललो, खळखळत्या पाण्यात पाहून मन मोकळे पणाने बोललो. या आधीही मी प्रेम केलं. अगदी जीवाला जीव देण्याइतंक केलं. आणि खरंच जीव देण्याची वेळ आली जेव्हा कळलं तिच्यासाठी मी विरंगुळा होतो. एकतर्फी ठरलं ते प्रेम.आठवणीत झुरण, रडणं, तहान-भूक हरपणं, एकांतात कोंडून घेणं, सगळ्याचाच योग एकत्र जुळून आला. जीव नको झाला. पण देणार तरी कसा.
उधार की जिंदगी अपनी..
माँ बाप की देन!!
वेगवेगळ्या कामात अडकवल. नव्या नव्या गोष्टी करू लागलो. इतरांसाठी जगू लागलो. स्वतःसाठी जगण्याची इच्छा उरलीच नाही. स्वतःसोबत तिला विसरून नाही, पण मागे सोडून पुढे चालू लागलो. अन् एक दिवस त्याच वाटेत ही भेटली.
आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. कधीतरी लक्ष जायचं तिच्याकडे. बोलती चिमणी होती. चिमणीसारा आवाज तिचा बोलायला लागली की तिची चिवचिव ऐकत बसावं वाटायचं. ओळख झाली. पुढे मैत्री झाली. दिसायला तर सुंदर होतीच पण त्याही पेक्षा गोड तिचा स्वभाव होता.
तिला माझं लिखाण आवडायचं. माझ्या कविता चारोळी लेख आवर्जून वाचायची. नकळत तिच्या प्रति ओढ मग आवड निर्माण झाली आणि तिनेही प्रेमाची कबुली दिली.
मी तिच्यासाठी लिहू लागलो. तिच्यावर जीव ओतू लागलो. तिही खूप लाडाने वागायची, जीव लावायची. काळजी करायची. अगदी बारीक - सारीक गोष्टींपासून आयुष्याच्या अडचणींपर्यंत सार काही पाठीशी घालायची. एव्हाना मी आयुष्यातील दुःख म्हणण्यापेक्षा माझं जग मागे सोडून तिच्या विश्वात रंगलो होतो. आणि अचानक एकदा ती म्हणाली आपल्या नात्याला शेवट नाही. आपण एकत्र येणं शक्य नाही. तिने अनेकदा असंच दर्शवलं. मी अगदी सहज घेत तो विषय.

तो - पण का, तीच ही प्रेम होतं ना तुझ्यावर, मग का फिरली ती मागे!
नात जोडलं ना, मग जपताना का असं केलं तिने?

कारण तिच्या घरातला देव वेगळा होता. अन् माझा तर देवच उरला नव्हता. तुझी जात वेगळी माझी जात वेगळी. या नात्याला काही अर्थ नाही.  माझ्या घरचे याला दुजोरा देणार नाहीत. म्हणत तिने नात्याला पाठ फिरवली अन् मला पुन्हा एकटा करून गेली...... मी

तो - असं कसं केलं तिने.
तिने तुझा जराही विचार केला नाही...

(बोलताना माझे शब्द कापत होते, मन जड झालं होत)
माहीत नाही. मी शेवटी तिला लग्नासाठी घरी मागणी घालतो म्हटलं. तिने त्यावर कायमचं लांब केलं. तिच्यासाठी जात महत्वाची होती. घरातील विरोध महत्वाचा होता. तिच्या नजरेत मी, माझं प्रेम, आमचं नातं याला काहीच जागा नव्हती. मुळात आतातर असच दिसतंय तिने कधी प्रेमच केलं नाही. ती फक्त प्रश्न घेऊन आली होती, ज्यांची उत्तर तिने आमच्या भेटीत शोधून निघून गेली.
जाताना तिला यवढंही कळलं नाही. मनावर कोरलेलं तिचं नाव, काव्यात रमलेल आमचं नातं सहज मिटवता येणार नाही. तिच्या इतकं लांबवर हातात हात घेऊन कधीची कुणासोबत गेलो नाही हे तिला कळलंच नाही.
ती एकटीच आहे जी माझ्यावर जीव लावते. अन् माझ्यासाठी जगते. आणि माझ्यासाठी एकुलती एक ती, का ते तिला जाणवलं नाही.

यावर तो म्हणाला...
तू चुकीचा विचार करतोय अस म्हणणार नाही. पण तिचं प्रेम आहे की नाही माहीत नाही. पण जात - पात, नि घरचा विरोध, तिची बाजू मी समजू शकतो. ती कोणत्या परिस्थितीत असेल याचा अंदाज आहे मला.
तिचं जर खरंच तुझ्यावर प्रेम असेल ना तर तुझ्याशी बोलण्यासाठी, तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझ्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणासाठी ती तुझ्या इतकीच झुरत असेल.
जातीनं तुम्हाला वेगळं केलं, आता तिनं तुझ्याकड, या नात्याकड जातीनं लक्ष देऊन या धर्म संकटातून बाहेर येऊन तुला साथ द्यावी म्हणजे एक सुंदर नात खुलेलं.
बस देव तिला त्या परीस्थितीशी लढण्यासाठी समर्थ करो. तिला योग्य अयोग्य ची निवड करून तुझ्यापर्यंत पोहचणारा मार्ग चालण्याचं सामर्थ्य देवो. तुझ्या प्रेमाची ज्योत इतकी तीव्र व्हावी की एकटी ती सर्वांशी लढावी.

मी - माझ्यासाठी लढायला तिच प्रेमच नाही माझ्यावर....

तोंड बंद कर, तुला काय माहीत तिची परिस्थिती. तिच्या घरचा विरोध.
तिच्या मनाची घालमेल तुला काय समजणार, तो म्हणाला.

मी - का? मला घर नाही? मला आई-बाप नाही? त्यांनी नाही केला का मला विरोध?
मी त्यांना पटवून दिल; rather देतोय सर्व परिस्थिती. नि बाहेर काढतोय त्यांना या जातपात नि intercast सारख्या बुरसटलेल्या विचारांतून. फक्त तिच्यासाठी, आमच्या प्रेमासाठी.

तू चुकत नाहींयस. तू लढायला शिकलायस परिस्थितीशी. ती अडकलीय परिस्थितीत.
जे तू नाही मी समजू शकतो, असच जनरली म्हणतोय, हसत तो म्हणाला.

मी - BC... थांब! जनरली तुझु स्टोरी सांगून जा आता.
(तसाच हसत हसत तो निघून गेला.)

३ महिने झाले आमच्या भेटीला.
त्याचे फोन कमी कमी होत आता बंदच झाले.
माझी परिस्थिती जाणणारा समजून घेणारा तोच अचानक पडद्याआड झाला. परिस्थितीने भांबावून सोडलं होतं मला. शेवटी त्याचं घर गाठलं. घरात एक भयाण शांतता पसरली होती. काहीच पहिल्यासार नव्हतं. एखाद्या वादळान उध्वस्त करावं असं शांत वातावरण पाहून मला ही काही कळलं नाही.

आई पाणी घेऊन जवळ आली. चेहरा उतरलेला;
बाबा सोफ्यावर बसून होते. गप्प.
शांततेला कापत मीच विचारलं.
काकी निलेश...???
त्याच नाव घेताच आई ढसाढसा रडू लागली.
मला काहीच कळत नव्हतं.
काकी काय झालं. रडताय का? शांत व्हा. रडू नका? बोला काय झालं?
निलेश कुठेय!

परिस्थितीची सूत्र जोडता जुळत नव्हती. काहीच संदर्भ लागत नव्हता.
विषय प्रेमाचा-लग्नाचा असावा, यवढं जरा मनात हुसकत होत.

काकी काय झालं....

(वारंवार विचारल्यावर त्याच्या आईने रडू आवरत बोलायला सुरुवात केली)
२ महिन्यांपूर्वी,
तो आमच्या जवळ येऊन बसला,
म्हणाला, आई मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचय.
सोबत तो त्या मुलीला घेऊन आला होता.
आमचा पारा चढला,
तुला म्हटलं होतं ना, ही मुलगी आपल्या घरात येता कामा नये. सांगितलेलं कळत नाही. आपल्या घरात love marriage चालणार नाही. तुला आमच्या अब्रूची, आमच्या जीवाची काहीच पर्वा नसेल तर कर मनासारखं.

तो म्हणाला, आई एकदा बघ तिच्याकडे. काय कमी आहे तिच्यात. सुशिक्षित देखणी, मला समजून घेणारी आणि खूप प्रेम करणारी. आम्ही दोघे नाही जगू शकत एकमेकांशिवाय.

हे(निलेश चे बाबा) खूप चिडले;  मग मरा. पण हे चालणार नाही. आमचे संस्कार बाजारात विकून आलास.
काय रे लहानाचा मोठा केला, याच दिवसासाठी का. अशी परतफेड केलीस का आई बापाच्या मायेची.
आणि तू ग तुला काय घर-दार आई बाप आहे की नाय, की सगळं सोडून दिलंस.
अगं बापाचा विचार केलास का कधी? त्यांच्या विरोधात लग्न केल्यावर काय होईल ते?
(निलेश तेव्हा पहिल्यांदा आमच्याशी असं बोलत होता. कदाचित पहिल्यांदा मन मोकळं बोलत होता.)

बाबा हिचा काय दोष. माझी काय चूक. आम्ही फक्त प्रेम केलं. एकमेकांना साथ दिली. आयुष्य एकत्र जगण्याची तयारी आहे आमची.

आई - हिचा दोष! ही आपल्या जातीत बसत नाही. कोण कुठल्या कडेच्या जातीतली ही, या लोकांची आपल्याशी काय बरोबरी. पैशाने असतीलही मोठी. पण मनाने आपण उच्च जाती - वर्गातले आणि हिला सून म्हणून आणू,
शक्य नाही.

आमचं बोलणं त्याला पटत नव्हतं आणि तो भडकला. 
अरे, उच-नीच जात-पात काय लावलंय हे. तुम्हाला परिस्थिती का नाही समजत. कोणत्या जगात जगताय तुम्ही. काही नसतं हे. जगात फक्त एकच जात आहे, माणुसकी. आणि ती प्रेमाने जपता येते. तुमचे बुरसटलेले विचार, ग्रासलेल्या जुन्या रूढी-परंपरा बदला. बाहेर या त्यातून, 
नाहीतर एकदिवस उद्रेक होईल साऱ्याचा. 
जग बदललंय. मागे पडलाय तुम्ही. बदला स्वतःला. असल्या भिकारड्या चालीरितींतून.....

त्याचे बाबा संतापले आणि एक कानसुलात पेटवली... 
(सगळं पाहून ती मुलगी रडू लागली)

बाबा - आता एक शब्द जरी बोलास ना याद राख. तोंड बंद ठेवायचं. 
जातीबाहेर लग्न करायचं तर आमच्यासाठी कायमचा मेलास.

आई - असल्या भिकारड्या मुलीसाठी जर आईबाप नको झाले असतील तर खुशाल जा. 
जग तुझं आयुष्य. पण आमच्या पिंडाला हात लावायला देखील मागे फिरायचं नाही.
या असल्या पोरी आज एका सोबत तर उद्या दुसऱ्याच्या बिछान्यात...

तो - (कटाक्ष नजरेने पाहू लागला)

ती - आई.. बास!
(धावत धावत, तिथून निघून गेली)

तो भावनेत भिजून आता बोलू लागला होता,
जिंकलात तुम्ही. तिला पार बाजारू म्हणून हिणवलात. ती नाही येणार परत. माझ्या प्रेमाची तिला मिळालेली शिक्षा नाही विसरणार ती. जिंकलात तुम्ही जिंकले तुमचे विचार, तुमच्या परंपरा. सर्व.

लहानपणापासून खूप लाडाने वाढवलात. हवं नको ते सारं पाहिलात. जाती बद्दलचा तुमचा द्वेष मनातील जातीयवाद आधीपासूनच जाणून होतो. शाळा ते कॉलेज असे अनेक मोहाचे क्षण आले. पण तुमच्या विचारांचा विचार करून नेहमीच मी स्वतःला अडवत आलो. मोकळेपणाने कधी जगलोच नाही. शिकणव्यतिरिक्त दुसर काही केलंच नाही. मित्रांसोबत मैत्रिणींसोबत खूप जगायचं होत पण अडवलं मी तुमच्यासाठी.

पुढे डिग्रीला ऍडमिशन आणि हिची पहिल्याच दिवशी झालेली भेट. 
अगदी माझ्यासारख मला कुणीतरी पाहतय अस वाटलं.
नव्या कॉलेजात ही पहिली मैत्रीण. एकदम डिसेंट.. सिम्पल, वैचारिक, सोज्वळ. मी स्वतःला भेटल्यागत वाटलं. पुढे आमचा चार आठ मित्र मैत्रिणींचा ग्रुप बनला. पण आमच्या दोघांतील नातं वेगळंच होत. तिला काय हवं नको ती थेट माझ्याकडे यायची. अन् माझ्या तर मित्रांनी तिला पार वहिनीचं करून टाकलं होत. पण मैत्रीच्या पुढे सरकताना हजार वेळा विचार आले नको, नकोसे. कारण तिच्या जातीचा प्रश्न पुढे ठाकणार हे ठाऊक होतं. पण काही गोष्टी ठरवून विचार करून होत नाहीत. नशिबानेच त्या घडतात. आमची जवळीक वाढली. प्रेम फुलले. कारण, आम्ही जणू एकसारखे नि एकमेकांसाठीच होतो. 
तिने शेवटपर्यंत साथ देण्याचं वचनही दिल. कोणत्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहायला तयार होती.

पण पुढे काय वाढलंय याचा अंदाज होता मला.
माझं प्रेम हरलं. तुमचं जातीच प्रेम जिंकलं. मी तिला विश्वास दिला होता. 
सर्वांच्या संमतीने परवानगीने दोन्ही परिवार एकत्र होऊन तुला घरी आणीन.
 मी खोटा ठरलो! तुम्ही जिंकलात. तुम्ही जिंकलात....... 
(अस म्हणत तो निघून गेला खोलीत)

निलेश इतका कणखर कसा वागला... 
आणि नेमकं काय झालं असेल... 
माझ्या डोक्यात विचारांनी आणि असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं 
आईला म्हटलं,
मग आता कुठेय निलेश, त्याने लग्न केलं का ?
आता इथे राहत नाही का? तुम्ही घराबाहेर.... 

काकी रडत रडत उठल्या. माझ्या हाताला धरलं नि वडत बेडरूम मध्ये नेलं.

निलेश एका कोपऱ्यात बसून होता. निपचित. भावना मेलेला. आत्माहीन. 
त्याच शरीरच होत फक्त. एकटक डोळे वटारून बघत बसला होता. 
मी आल्याचाही त्याला थांगपत्ता नाही.

मी त्याच्या आईकडे बघितलं.
(आई बोलू लागली)
तिने आमच्यापासून आमचा मुलगा तोडला. बघ काय अवस्था झालीय त्याची. चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्य संपवून घेतलंय बघ. जिवंत मुडदा बनून राहिलाय.
स्वतःला या चार भिंतीत डांबून घेतलंय. 
ना अन्न शरीराला लागतंय. ना मोकळा श्वास.

मागासपासून शांत बसलेले बाबा खाड्कन उठले,
मेलाय तो मेलाय. फक्त शरीर जाळायच उरलंय. कशासाठी जगायचं असल्यांनी, ज्यांना आई बापाच्या संस्काराची, समाजाची, परंपरेची जाण नाही.. त्यांनी जगण्यापेक्षा मेलेलंच बर. नको रडुस असल्या मजोऱ्यांसाठी.

बाबांचा आक्रोश, आईचा राग, निलेशची ही अवस्था; माझ्या पायाखालची जमीन सरकली.

दबक्या आवाजात मी विचारलं,
काकी हे सगळं कस, 
निलेशची हि अशी अवस्था ... ?

आई - तो रात्रभर तिला फोन करत होता. तिने उचलला नाही. रात्रभर रडला. उपाशी राहिला. 
अन् दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला.

ती त्याला म्हणाली,
काल आई बाबांनी म्हटलं तस तुलाच आता ठरवायचंय मी किंवा ते. 

तो - अग ऐक ना माझं.

ती - नाही. यापुढे मला जास्त काहीच बोलायच नाही, ऐकायचं नाही. 
तुझं माझ्यावर प्रेम आहे. माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे.
तू प्रयत्न केलास. पण आता निर्णय घे. 

मी लग्न करून त्या घरात नाही येऊ शकत. तुला मी हवी तर त्यांना सोड. घर सोड. लग्न करून बाहेर राहू. 
तशा विचारांच्या लोकांशी मला काही संबंध जोडायचा नाही. माझ्या चारित्र्यावर बोट उचलणारे, उद्या माझा जीव ही घेतील. असला सासुरवास नको मला. आणि त्यांचे 3rd level thoughts पाहता ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. आणि मला कधीच स्वीकारणार नाहीत.
So, take your decision. Bye.
(तीही दुखावली होती, रागावून आपला निर्णय ऐकवून तिने फोन कट केला)

तो - हॅलो हॅलो. अग ऐक... 

आई - तो द्विधा परिस्थितीत अडकला होता. तो प्रेमाला विसरू शकत नव्हता आणि आम्हाला सोडु शकत नव्हता. दोन्ही विचारांत  घुसमट होऊ लागली त्याची. गप्प गप्प राहू लागला. सतत तेच विचार. तोच ताण. तो मेंटली डिस्टब झाला. निर्णय घेण त्याच्या आवाक्यात राहील नव्हतं.
आणि एक दिवस... तो 
(कानात आवाज घुमत होता.. त्याच विचाराने जड झाला होता. आणि )शेवटी चक्कर येऊन पडला. 

आणि तेव्हापासून ना कुणाशी बोलतो, न जेवतो. या चार भिंतीत एक मृत शरीर बनून निपचित पडून राहतो.

डॉ. म्हणतात त्याचा sense गेलाय. 
त्याला आपण बोलेल काहिच समजणार नाही. स्पर्शाची - भावनांची जाणीव त्याला राहिली नाही. 

मी मनात म्हटलं, जाणीवच तर मारून टाकलात त्याची. 

आई - तो एक देह आहे फक्त
ज्याची सुटका फक्त मरणचं.
(अस म्हणत आई रडू लागली)
(बाबा! पुन्हा जागेवर बसले)

जे काही घडलं, ते माझ्या कल्पने बाहेरच होत. 
पण निलेश,,,
तो जाती विरोधात उभा तर राहिला 
पण प्रेम आणि परिवार यात अडकलाच
त्याच्या सारख्या समंजस मुलाला सोडणं आणि तोडणं कळतंच नाही. 

मी त्याच्या जवळ गेलो. चेऱ्यावर काहीच भाव नव्हते. दाढी केसांनी चेहरा विद्रुप झाला होता. 
प्रेमाचं वेड त्याला वेड करून गेलं की जातीयवाद त्याच आयुष्य उध्वस्त करून गेला, कळत नव्हतं.
त्याचा हात धरून मी त्याला बाहेर घेऊन गेलो. 
But still he is Senseless.

आम्ही नेहमीच्या जागी गेलो. त्याला बसवलं. 

तो गप्पच होता.
मी बोलू लागलो.

निलेश, तुला आठवतय इथे आपण काय मस्ती करायचो. छान होते ना ते दिवस. आणि तो गणपतीचा किस्सा आठवतोय तुला... 
निलेश...
(तो निःशब्द... एक नजर)

मी त्याच्या समोर बसलो

मित्रा प्रेम आणि परिवार दोन्ही बाजु सावरताना आज तू स्वतःला विसरून बसलास. आणि मी...

तुला माहितीय माझी आई गेली. आजारातून उठलीच नाही. 
आज तिचं कार्य झालं. मायेचं छत्र हरपलं.
आणि अजून काय झालं माहितीय,,,
आईने जाताना मला बोलवलं आणि म्हणाली...
'बाळ, आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य तुला आज सांगते'

मी आईचा हात हातात घेतला.
ती म्हणाली, तू खूप लहान होतास. अगदी कोवळ्या रोपटयासारखा. तुला नात्याची माणसांची ओळख नव्हती. तेव्हा तुला आणला.

मला काही कळालं नाही, म्हणजे...

आई - तुला अनाथाश्रम मधून दत्तक घेतलं. तुला मी जन्म नाही दिला. 

हे ऐकताच, माझा हात झटकन सुटला, अन् आईचा श्वास.
आई... आई... आई...

(निलेशच्या डोळ्यांत हालचाल दिसली, त्याच्यात भावना जागल्या)

तिचे शेवटचे शब्द अन ती पुन्हा अनाथ करून गेले. 
जन्म दिला नसेल तरी मातृत्व निभावलेली तीच माझी आई. 

मी - अनाथ होतो. हे कसलं सत्य. आयुष्याच हे कसलं वळणं.

मी परत अनाथ झालो!

आज अनाथ म्हणून त्याच्यापासून लांब झालो.. जातीसाठी तिने मला लांब केलं
अरे जर मी अनाथ आहे, तर सांगा मला माझी जात कोणती?

मनाचा बांध फोडून
उभा राहिला तो प्रेमासाठी,
विश्व सारे तुमच्या पायी
अन् जगायला निघाला स्वतःसाठी...
संस्काराच्या ओझ्याखाली
दाबता तुम्ही कशासाठी,
प्रेम नव्हे तर स्वतःला विसरला
सांग विधात्या,
कोण जबाबदार या परिस्थितीसाठी...

(त्याच्या डोळ्यांतून थेंब गळू लागले)

अरे कसला समाज कसली भीती
का जपता असल्या चालीरीती,
माणूस म्हणून जगताना
का आडव्या जाती पाती...
प्रेम देऊन प्रेम घेऊन
जगू दे आम्हाला आमच्यासाठी,
सुख आमुचे हित मायबापाचे
सांग विधात्या,
मग हा विरोध कशासाठी...

(त्याच्या हातापायांत चेहऱ्यावर दुःख दिसले, राग दिसला)

आयुष्याच्या वाटेवर आज
उभा एकटा ठाकलो,
प्रेम घेऊनि प्रेम देऊनी
अनाथ शेवटी ठरलो...
अरे कसले भाग्य लिहलेस
कपाळावरती,
मिटली सारी नाती गोती..
सांग विधात्या,
जात माझी कोणती????
जात माझी कोणती????

निपचित बसलेला तो जोरात ओरडला  
आणि घट्ट मला मिठी मारली.

जातीचं प्रेम त्याला उधवस्त करून गेलं 
आणि मी..... 
जात माझी कोणती?