Friday, June 2, 2023

मृत्यू आपल्या नजीक...

काल पर्वा आपला GDP डाटा आला... आपण ग्रोथ केली... भारत विकास करतोय देश विकास करतोय... प्रगती होतेय... आपण विकसनशील देशाकडून विकसित होण्याकडे आणखी एक एक पाऊल पुढे टाकत आहोत...

पण आपण सुरक्षित आहोत का?

नाही मृत्यू प्रत्येक वेळी आपल्या आसपास आहे तो वाट बघतोय आपल्या एखाद्या चुकीची. कुणालाही माहीत नाही आपल्या आयुष्यात उद्या काय वाढून ठेवलंय.


ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील कोरोमण्डल रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 233+ तर जखमींचा आकडा 900 पार पोहोचला आहे. अद्याप संपूर्ण डबे हटवण्याच कार्य सुरू असून मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढतच आहे.


दोन प्रवासी रेल्वे आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वेच्या या भीषण अपघातात मृत्यू जरी 200 लोकांचा झाला असला तरी आयुष्य 200 कुटुंबांची उध्वस्त झाली आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असली तरी आपली तारांबळ उडते. तर विचार करा काल असलेली व्यक्ती आज घरात नसेल तर त्या 200 कुटूंबाची काय अवस्था असेल?

सरकार ने 10 लाखांची मदत घोषित केली, पण कुठपर्यंत पुरणार हे पैसे. त्या माणसांची त्यांच्या जाण्याने कुटूंबात निर्माण झालेली पोकळी भरून निघेल? पण तरीही ह्या अपघाताचं राजकारण करून येणाऱ्या अनेक निवडणुका लढवल्या जातील. पण ही मदत आणि ह्या अपघाताची वेळ आलीच कशी.. आणि का?

सध्या प्रथमदर्शी रेल्वे सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 3 रेल्वेगाड्यांची धडक झाल्याचं वृत्त आहे. खरच हे सत्य आहे का? जगातील चौथ्या क्रमांकावर भारतीय रेल्वे व्यवस्था मानांकित आहे आणि अशा मानांकित व्यवस्थेच्या सिग्नल मध्ये बिघाड होतो आणि इतका भीषण अपघात होतो की 200 कुटुंब उध्वस्त होतात.. खरंच? तांत्रिक बिघाड?


आपल्या भारतातील लोक टॅक्स भरण्यासाठी टाळाटाळ करण्याचं हे एक कारण नक्कीच असू शकत की कर भरून सुद्धा त्याच्या बदल्यात योग्य सुविधांची कमी आणि सुरक्षिततेची नो गॅरंटी!

आज माणसाचं आयुष्य काय आहे... दोन वेळ अगदी हेलथी जेवण आणि एक्ससाईज जरी करून जगलं तरी हार्ट अटॅक सारखी टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे.. त्यातून वाचलो तर उष्णतेची लाट तर कधी अति वृष्टी महापूराचा धोका.. त्यातूनही वाचलो तर तांत्रिक बिघाड होऊन हे असे अपघात किंवा कृत्रिम हल्ले. त्यामुळे मृत्यू प्रत्येक वेळी आपल्यावर नजर रोखून आहे, आपल्या एका चुकीची वाट बघत आहे.

आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला आपली जीवनशैली बदलायला हवी. आणि सोबत सरकार व राजकारण सुद्धा बदलायला हवं. मैतावर उपचार कार्य करणार सरकार नको तर अशा दुर्घटना होणार नाहीत यासाठी प्रसतिबंधात्मक उपाय योजना आखणार सरकार हवं मग ते कोणत्याही पक्षाच असो!

नाहीतर हे असंच घडत राहणार. आपल्या हातात केवळ हेच उरत मग मेणबत्ती लावा आणि माझ्यासारख्यानी लिहून बातमी करा. पण लक्षात घ्या, हे आपल्या सोबत सुद्धा घडू शकत कधीही कुठेही कारण मृत्यू आपल्या नजीक आहे...


- रोh@nj