त्याचे डोळे पाणावलेले. नजरेला नजर भिडल्यावर हसत म्हणाला.. म्हणजे माझं तस काही नाही, पण generally सांगतोय, मी तस काही करू शकत नाही.
दोघे वाढत होतो. शाळा संपली. पुढचं शिक्षण ही चालू होऊन पूर्ण झालं. खर्चाच्या बाबतीत आपल्या मध्यमवर्गीयांवर काळे ढग नेहमी असतातच. पण त्याच त्याला वाईटही आणि कुतुहलही वाटलं. कारण त्याने Admission राखीव जागेतून भेटत असताना ते नाकारून आपल्या योग्यतेवर घेतले. पण त्यातही त्याला Free ship दिली गेली. यात तो थोडा चकित आणि त्रस्त ही होता. पण आजवर या विषयावर आम्हा दोघांत सविस्तर बोलणं झालं नव्हतं.
आता वयाची पंचविशी ओलांडलेले आम्ही. हल्लीच भेटलो होतो. थोडा हिरमुसला दिसत असताना हसत आलिंगण देत म्हणाला, अरे ही कशीय?
छान होती मुलगी. साडीवर उठून दिसत होती. कोणय म्हटलं, त्यावर म्हणाला 'अरे लग्नाचं सुरू आहे, हीचा फोटो आलाय'.
ओहहहह. बकरा कटने वाला है.... थोडी चेष्टा करत म्हटलं छान आहे. पण तुला पसंदय ना!
त्यावर त्याने उत्तर दिलं माझं सोड, तुला काय वाटतंय.
त्याच उत्तर ऐकून थोडा धास्तावलो. अरे लग्न तू करणारयस म तुझे विचार, तुझं मन, तुझी भावना महत्वाची. माझे किंवा दुसऱ्ह्याचे विचार जाणून काय करणार ना.
त्यावर म्हणे, लेखकाच्या दृष्टीने आणि विचाराने तिला बघून सांग म्हटलं मित्रा. तुझं मत तुझे विचार महत्वाचे. चण्याच्या झाडावर बसवून आपटायचा विचार होता वाटत त्याचा. थोडं त्याच्या डोळ्यांत बघून म्हटलं.
अरे भावा कोण? काय हे मध्येच?कोण नाय रे बाबा?
मग रोज फोनवर कोण असतं... तुझं social networking च update असत माझ्याकडे up to date. शिवाय तुझं वागणं हि कळतंय की, मी म्हटलं.
नाय रे बाबा, च्यायला उगाच नको ते बोलू नकोस, कोण नाय आपलं.
मग गेली तीन वर्षे कोणाच्या बड्डे साठी माझ्याकडून मेसेज बनवून घेतलेस?
आणि माझ्याकडचे status... Sensitive मेसेज कशाला नि का हवे असतात तुला.
अरे बाबा ते सहज तुझं लिखाण वाचायला आवडत म्हणून. - तो.
मी -ओह्ह्ह्ह!! मित्रा माझ्याजवळ तरी खोट बोलू नको. कोणाच्या भावनांबरोबर खेळून, ओढ लावून त्याला अर्ध्यात सोडू नये. स्वप्न एकत्र बघून त्यांच ओझं एकट्यावर टाकू नये. समोरील व्यक्ती आयुष्यभर ते ओझं पेलवून जगेल. जगेल म्हणण्यापेक्षा तीळ तीळ मरेल. समोरील व्यक्तीच्याही भावना समजून घे.
भावनाच तर समजू शकत नाहीत आपल्या घरचे. त्यांच्यासाठी जात-पात, त्यांची खोटी प्रतिष्ठा नि सोबतीला लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं, तो म्हणाला.
(डोळ्यांतून होणार पाण्याचा उद्रेक त्याने आवरून धरला होता. तो थांबला. पाठीवरून हात फिरवत म्हटलं बोल. मोकळा होशील.)
तो - अरे म्हणजे माझं तस काय नाहीय. पण बघ तर आपण कुणावर प्रेम केलं म्हणजे कुणाच्या प्रेमात पडलो तर ते जात विचारून करतो का? समोरच्याची जात धर्म सोबत लोक काय म्हणतील हे पाहून प्रेम करतात का? मुळात प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल कळतं नाही. प्रेमाची भाषा वेगळीच असते . प्रेमाला जात धर्म कळत नाही.
काय झालंय नेमकं. Inter-cast चा problem आहे का? घरी बोलास का? स्पष्ट बोल रे काय झालंय नेमकं? कोणय ती? कुठलीय?
पुन्हा हसू लागला. अरे बाबा मी generally बोलतोय. आपण प्रेम करणार आणि पुढे जर cast वरून आपल्याला वेगळं केलं जाणार असेल तर काय अर्थ य त्याला. - तो.
कोण आहे ती सांग? आपण करू solve आणि करू! नाहीच पटलं तर तुमचं लावून द्यायची जबाबदारी माझी. - मी
तो - नाहीय रे बाबा तस काय आणि कोणीही पटवून दिल तरी आई पप्पांना नाही पटणार ते. लहानपणापासून ओळखतो त्यांना, त्यांचे विचार महितीयत मला. त्यांना प्रेम आणि नात्यापेक्षा त्यांच्या so called परंपरा महत्वाच्या.
मी - तुझी तयारी ठेव तुझं लग्न मी लावतो.
तो - हाहाह... अरे माझं नाय मी आपल्या आई वडिलांची मानसिकता सांगतोय. आणि तस असततरी मी विरोधात जाऊन काहीच केलं नसत. कलियुगात देव कोणी पाहिला नाही. देव म्हणजे आपला पालनकर्ता पण तो आईवडिलांत दिसतो. म्हणजे लहान पणापासून आपल्याला हवं नको ते बघणारे ते... २५-३० वर्ष रक्त आटवून सावरणारे ते...
त्यांच्या विरोधात जाऊन कसं काय करायचं. त्यांना रडताना आणि चार चौघात खाली मान घालून जगताना नाही पाहू शकत.
(तो बोलतच होता आता, मनावरचं दडपण काढून)
लहानपणापासून हट्ट पुरवताना त्यांना आपल्यावर त्यांची स्वप्न आणि इच्छा लादण्याची नकळत सवयी झालेली असते. आणि लग्न ही त्यांची शेवटची इच्छा म्हण, जी ते आपल्यावर लादतात. आयुष्यात जितकं प्रेम त्यांनी त्यानी केलेलं असत त्याची परतफेड ते येथे अपेक्षित करतात, की आपल्या म्हणण्याप्रमाणेच मुलाला हळद लागावी. त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा समजून का होईना मी विरोधात नाही करू शकत काही. त्यांना त्रास झाला तर माझे हातपाय कापतात, या मार्गावर चाललो तर...
"मी नाही करू शकत अस. स्वतःच्या सुखासाठी आपल्या आईबाबांना त्रास देण्याइतका खंबीर नाही मी. स्वतःच्या बाबांना रडताना पाहण्या इतका खमका नाही मी. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देऊन काही मिळवण्यापेक्षा तो मार्गच मला चालायचा नाही. त्यांना रडताना नाही पाहू शकत. म त्यासाठी मला सगळं, काहीही सोडावं लागलं तरी चालेल."
आणि ठिकय ना, आपल्याला याच स्वातंत्र्य नाही. आज मी त्यांच्या इच्छेसाठी स्वतःची इच्छा मन मारून जगेन पण आपल्या पुढच्या पिढीला माझ्या मुलामुलींना ते स्वातंत्र्य देणं की ते आपल्याला योग्य तो निर्णय आणि प्रेमाचं नात जोडू शकतील- तो थांबला होता.
मी - कलियुगातील देव माहीत नाही. देव कसा तेही माहीत नाही, पण आज तुझ्यात देव दिसला. इतका विचार आणि भावना साठवून मनाविरुद्ध जगणं hats of u! पण तू म्हटलास पुढच्या पिढीला आपल्या मुलांना जातीत न अडकता प्रेमाचं स्वातंत्र्य देऊ.
म्हणजे आपलं लग्न मग मुलं.. म मुलांची लग्न.. तेव्हा त्यांना स्वातंत्र्य देणार. तेव्हा या बुरसटलेल्या विचारातून स्वातंत्र्य भेटणार. म्हणजे हा बदल घडायला आणखी २५ वर्षे जाणार.
तोही विचारात पडला इथे.
२०-२५ वर्षे मी नाही थांबू शकत.
जर आज याविरुद्ध आवाज नाही उचलला तर उद्या तुझ्या सारखेच कितीतरी मरत मरत जगतील कदाचित या ओझ्याने मरतीलही.
मी नाही थांबू शकत या बदलासाठी २५ वर्षे. मी तेव्हा असेल की नाही हे पण माहीत नाही. पण आता याला विरोध केला तर किमान दहातील एक दोघे तरी खंबीर उभे राहतील. आणि आपल्या मागच्या पिढीला सत्य काय ते दाखवतील. आयुष्याचा आरसा त्यांच्यापुढे उभा करून जाती धर्माच्या विळख्यातून त्या पिढीला बाहेर काढतील.
मला त्यांच्याविषयी वाद किंवा त्यांच्या प्रेमावर टीका नाही, पण विखुरलेल्या आणि तुच्छ शूद्र विचारांना माझा विरोध आहे.
प्रेम जात पात धर्म पाहून केलं जातं नाही. मुळात ते केलं जातं नाही. आपसूकच होत. नकळत. म ते झाल्यावर लोक काय म्हणतील आणि त्यात तुच्छ लोकांनी आखलेल्या परंपरेसाठी त्या प्रेमाचा त्याग करायचं मला पटत नाही.
मान्यय त्यांनी जन्म दिला लहानाच मोठं केलं. २५ वर्षे वाहून घेतलं. पण तुला ज्या मुलीने २५ दिवस प्रेम दिल तू तिला जवळ केलंस ना ती पुढची ५० वर्षे स्वप्नात रंगवून बसलीय. आयुष्य एकमेकांसाठी जगण्याच्या मनोमनी शपथा घेऊन ती आणि तू ही तयार होतासचं. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे परिवार हे किती कठीण निवड असते याची कल्पना आहे मला पण जन्मदात्यांना सोडणं चुकीचंच पण ७ जन्म साथ देण्याची वचनं दिलेल्या व्यक्तीला बुरसटलेल्या विचसरांसाठी सोडणं हा मार्ग नाही, मी म्हटलं!
मी - या पिढीला हे मान्य करावं लागेल. त्यांचे विचार बदललेचं पाहिजेत. त्यांनी याचा स्वीकार करणे हाच योग्य मार्ग आहे. आणि ते पटवून देणं हाच आपला लढा आहे. आपल्यात क्षमता हवी त्यांना सत्य आणि प्रेम पटवून देण्याची. त्यांच्या विरोधात नाही, त्यांना घेऊन सोबतीने पुढे जाण्याची तयारी आपली असायला हवी. यासाठी हिंसा अहिंसा दोन्ही करावं लागेल.
ही लढाई माय बापाशी नसेल. त्यांच्या विचारांशी असेल, हे युद्ध दोन गटांत नसेल. दोन पिढ्यांच्या विचारांत असेल. पण यात विजय नक्कीच सत्याचा होईल. माणुसकी शिवाय दुसरी जात नसेल भविष्यात... पण त्यासाठी २५ वर्षे थांबायचं नाही. नाहीतर आपल्यासारखे अजून मरत राहतील क्षणा क्षणाला.
तो - तू एवढा का सिरीयस झाला, माझं काय नाही रे बाबा.. मी just विचार सांगितले तस झालं तर काय होईल. पण आपल्यासारखे म्हणजे तुझं काय प्रकरण...!!!
निशब्द सार!!
To be Continued..........
तुझ्या लिहणायाल तोड नाही भावा अप्रतिम मित्रा
ReplyDeleteधन्यवाद गावडे साहेब!!
DeleteNice bro
ReplyDeleteThanks Bro...
DeleteKhup Chan
ReplyDeleteThank you!!
Deletekhup sunder.
ReplyDeleteDhanywad
Deleteपण तुला ज्या मुलीने २५ दिवस प्रेम दिल तू तिला जवळ केलंस ना ती पुढची ५० वर्षे स्वप्नात रंगवून बसली....
ReplyDeleteइथेच सगळं जिंकलस.... रोहन...
धन्यवाद मंगेश
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमस्त झालीय... आवडली...
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteKhup chan bro....
ReplyDelete